लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दावोस येथे झालेला राज्य सरकारचा दौरा १०० टक्के यशस्वी झाला आहे. गुंतवणुकीसाठी गुरुवारपर्यंत ३७.२७ लाख कोटी रुपयांचे करार झाले असून त्याद्वारे ४३ लाख २५ हजार रोजगार होणार आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. काही उद्योजकांबरोबर बोलणी झाली असून एक-दोन महिन्यात ५ ते ६ लाख कोटींचे करार होणार आहेत, असे ते म्हणाले.
दावोसचा खर्च मांडणार
सामंत म्हणाले की, शासन म्हणून दावोसला जातात आणि इकडे फेक नरेटिव्ह पसरविण्याचा प्रयत्न केला जातो. पत्रकार परिषद घेणाऱ्यांनी एकदा गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरीला घेऊन जाऊ आणि किती उद्योग जमिनीवर आले ते दाखवू. तसेच दावोस दौऱ्यावर किती खर्च झाला ते मी मांडणार असल्याचे सामंत म्हणाले.
सर्वात जास्त गुंतवणूक कुठे?
सर्वाधिक गुंतवणूक एमएमआर विभागात येत आहे. एमएमआर विभागात गुंतवणुकीचे ३७ करार झाले असून त्याद्वारे २४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येत आहे आहेत.
