Reliance Jio Vs Airtel: जिओ आणि एअरटेल या भारतातील दोन मोठ्या टेलिकॉम कंपन्या आहेत. देशातील बहुतांश मोबाइल युजर्स जिओशी जोडलेले आहेत. युजर्सच्या बाबतीत एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर आहे. दोन्ही कंपन्या आपल्या युजर्सना खूप चांगले आणि परवडणारे रिचार्ज प्लान्स ऑफर करतात. अशातच आज आम्ही तुम्हाला ३० दिवसांची वैधता असलेल्या जिओ आणि एअरटेलच्या रिचार्ज प्लानबद्दल सांगणार आहोत, त्यानंतर तुम्हाला कल्पना येईल की कोणती कंपनी ३० दिवसांच्या वैधतेसह चांगले रिचार्ज ऑफर करत आहे.
जिओचा ३० दिवसांची वैधता असलेले रिचार्ज तुम्ही ३३५ रुपयांत खरेदी करू शकता. तर एअरटेलचा ३० दिवसांची वैधता असलेला रिचार्ज तुम्ही ३७९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. यामध्ये दोन्ही रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत ४४ रुपयांचा फरक आहे.
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
जिओचा ३३५ रुपयांचा प्लान
जिओचा ३३५ रुपयांचा प्लान ३० दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. तसंच एकूण २५ जीबी डेटासह दररोज १०० फ्री एसएमएसचा लाभ मिळतो. जिओच्या या प्लानमध्ये युजर्संना जिओ हॉटस्टार आणि जिओ क्लाउडचा फ्री अॅक्सेस देखील मिळतो.
एअरटेलचा ३७९ रुपयांचा प्रीपेड प्लान
एअरटेलच्या ३७९ रुपयांच्या प्लानची वैधता ३० दिवसांची आहे. या प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. तसंच दररोज २ जीबी डेटा आणि १०० फ्री एसएमएसचा लाभ मिळतो. याशिवाय एअरटेलच्या या प्लॅनमध्ये युजर्संना एअरटेल एक्सट्रीम अॅपचा अॅक्सेस देखील मिळतो.