Lokmat Agro >हवामान > Ujani Dam Water : उजनीतून दररोज सुमारे ४२०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू; धरणात उरला किती पाणीसाठा?

Ujani Dam Water : उजनीतून दररोज सुमारे ४२०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू; धरणात उरला किती पाणीसाठा?

Ujani Dam Water: Water discharge from Ujani starts at around 4200 cusecs per day; How much water is stored in the dam? | Ujani Dam Water : उजनीतून दररोज सुमारे ४२०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू; धरणात उरला किती पाणीसाठा?

Ujani Dam Water : उजनीतून दररोज सुमारे ४२०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू; धरणात उरला किती पाणीसाठा?

उजनी धरणात उन्हाळ्यात नदीपात्रात पाणी सोडण्याची तरतूद नसताना देखील दरवर्षी राजकीय दबावापोटी उजनी धरणातून बेकायदेशीररीत्या नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे.

उजनी धरणात उन्हाळ्यात नदीपात्रात पाणी सोडण्याची तरतूद नसताना देखील दरवर्षी राजकीय दबावापोटी उजनी धरणातून बेकायदेशीररीत्या नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पळसदेव : उजनी धरणात उन्हाळ्यात नदीपात्रात पाणी सोडण्याची तरतूद नसताना देखील दरवर्षी राजकीय दबावापोटी उजनी धरणातून बेकायदेशीररीत्या नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे मात्र धरणग्रस्त शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

यावर्षी देखील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सुमारे ११ टीएमसी पाणी बेकायदेशीररीत्या सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जो धरणग्रस्तांना रस्त्यावर आणणारा आल्यात मत उजनी धरणग्रस्त इंदापूर तालुका बचाव कृती समितीचे अध्यक्ष अरविंद जगताप यांनी व्यक्त केले.

कालवा सल्लागार समितीच्या झालेल्या निर्णयानुसार भीमा नदीतून पहिलं आवर्तन ६ एप्रिल ते २० एप्रिल यादरम्यान ६.५० टीएमसी व २६ मे ते ७ जूनपर्यंत ४.५० टीएमसी पाणी सोडण्याचा बेकायदेशीर निर्णय झाला आहे.

मूळ सीनचा आराखड्यात उन्हाळ्यात नदीपात्रात पाणी सोडण्याची तरतूद नसताना हा प्रताप करण्यात आला आहे. उलट धरणग्रस्तांच्या हक्काच्या राखीव पाण्याची तरतूद करण्यात आली नाही, त्यामुळे सरकारने पुन्हा यावर्षी धरणग्रस्त शेकऱ्यांवर अन्याय केला असल्याचा आरोप अरविंद जगतापसह धरणग्रस्त शेतकरी करीत आहेत.

५० गावांतील नागरिकांना फटका
१) विशेष बाब म्हणजे इंदापूरचे आमदार व विद्यमान क्रीडा मंत्री यांच्या काळात लवादाचा हा निर्णय झाला होता. त्यानंतर भरणे यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद असतानाच्या काळात देखील इंदापूरच्या आमदारांची तालुक्यातील जनतेचा उजनीच्या राखीव पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पाइपलाइन पूर्ण कारण्यासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत, असा आरोप अरविंद जगताप यांनी केला. त्यामुळे सध्या इंदापूर तालुक्यातील धरणग्रस्त २७ गाव व उजनीच्या पाण्यावर अवलंबून असणारी २० ते २५ अशी सुमारे ४० ते ५० गावांतील नागरिकांना याचा फटका बसला आहे.
२) पाण्यासाठी शेतकऱ्यांना जीवाचं रान करून उजनीतील गाळात पाइप व केबल वाढवण्याची वेळ आली आहे. धरणग्रस्त शेतकरी मामा आम्हाला विकास नको, आमच्या शेतीला पाणी द्या, अशी विनवणी करत आहे. तरी उजनीच्या हक्काच्या पाण्याबाबत काठावरील शेतकरी संघटित नसल्याने राज्यकर्ते केवळ पाण्यावर राजकारण करून वेळ मारून नेत आहेत व दरवर्षी शेतकऱ्याला मात्र हक्काच्या जमिनी देऊन पाण्यासाठी रडत बसण्याची वेळ आली आहे.

धरणात पाणीच शिल्लक राहणार नाही
सध्या उजनी धरणात केवळ १८.६४ टीएमसी पाणी शिल्लक आहे आणि दररोज सुमारे ४२०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बोगदा ३३३, कॅनॉल २८५० क्युसेक, दहिगाव योजना १२० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याचप्रमाणे विसर्ग सुरू राहिल्यास ७ जूनपर्यंत सोडण्यासाठी धरणात पाणीच शिल्लक राहणार नाही.

अधिक वाचा: नोटीस अथवा पूर्वसूचना न देता लाईट कनेक्शन तोडता येते का? काय आहे नियम? वाचा सविस्तर

Web Title: Ujani Dam Water: Water discharge from Ujani starts at around 4200 cusecs per day; How much water is stored in the dam?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.