Maharashtra Weather Update : राज्यात होळीनंतर उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला होता. त्यातच आता मागील दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पावसाची (unseasonal rains) शक्यता वर्तविण्यात आली आहे. तापमानाचा पारा चाळिशीपार पोहोचला आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आज (२७ मार्च) रोजी राज्यातील वातावरणात अधिक उष्णता जाणवणार आहे. त्यातच आता दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची (unseasonal rains) शक्यता वर्तविण्यात आली असून, काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता आहे. मुंबई, पुणे, लातूरसह अनेक ठिकाणी तापमानात वाढ झाली आहे.
होळीनंतर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने (unseasonal rains) हजेरी लावली आणि वातावरणात मोठा बदल झाला. आता परत एकदा उष्णतेचा पारा चढताना दिसत आहे. काही ठिकाणी तर तापमान हे ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस (unseasonal rains) बरसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. होळीच्या अगोदरच दोनदा हवामान खात्याकडून उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आला. बुधवारपेक्षा आज वातावरणात उष्णता आणि उकाडा अधिक जाणवणार आहे, असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
अवकाळी पावसाचा अंदाज
* दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर वारे ताशी ३०-४० किमी वेगाने वाहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
* गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्याला अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसतोय. काही दिवसांपूर्वीच लातूरला अवकाळी पावसाने झोडपल्याचे बघायला मिळाले.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* रब्बी ज्वारी आणि गहू पिकाची काढणी करून मळणी केली नसल्यास मळणी करून मळणी केलेला माल उन्हात वाळवून साठवणूक करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.