Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. विविध भागात मुसळधार पावसाची (Heavy Rains) शक्यता असल्याने हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Rain Alert)
कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर विशेषत: विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे.(Maharashtra Rain Alert)
महाराष्ट्रात पावसाने जोर धरल्याने राज्यातील बहुतांश भागात हवामान विभागाने यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर काही भागांत वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आला आहे.(Maharashtra Rain Alert)
ऑरेंज अलर्ट
बुलढाणा, अकोला, अमरावती, सिंधुदुर्ग, गडचिरोली येथे विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड येथील घाट विभागात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
यलो अलर्ट
विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकणातील बहुतांश जिल्ह्यात ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे, विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई येथे मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पुणे हवामान
पुणे शहरात आज आकाश अंशतः ढगाळ राहील. विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, घाट भागात व काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
येत्या पाच दिवसात कुठे कोणता अलर्ट
२६ जून रोजी रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग येथे ऑरेंज अलर्ट
विदर्भातील बहुतेक जिल्हे, मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, कोल्हापूर येथे यलो अलर्ट
२७ जून रोजी रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथे ऑरेंज अलर्ट
पालघर, ठाणे, मुंबई, अमरावती, वाशिम, यवतमाळ येथे येलो अलर्ट
२८ जून रोजी कोकण विभागात पालघर, ठाणे, मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याने येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भात वाशिम, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, बुलढाणा, अकोला, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर येथे विजांचा कडकडाट, मेघगर्जना, वादळी वाऱ्यांसह पाऊस.
राज्यातील शेतकरी, नागरिक आणि पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्या लोकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे. पावसामुळे सरी पडू शकतात, वादळामुळे वीज प्रवाह आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* वाऱ्यामुळे नुकतीच लावलेली किंवा उगवलेली पिके झोपण्याचा धोका असतो. ती योग्यरीत्या बांधून ठेवावीत किंवा आधार द्यावा.
* पावसाची शक्यता असल्याने काही दिवस सिंचनाची गरज नसेल तर पाण्याचा अपव्यय टाळा. पिकांना आवश्यकेनुसार पाणी देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.