Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात मान्सूनचा जोर अधिकच वाढत असून आज (२६ जून) रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. (Heavy Rain in Maharashtra)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामानात बदल झाले असून महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढली आहे. आज राज्यात हलक्या ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांना अलर्टही जारी करण्यात आला आहे.
आजचा दिवस पावसाचा आहे. राज्यात २६ जून रोजी मान्सून जोरदार सक्रिय आहे. हवामान विभागाने (IMD) पुणे, सातारा, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी अलर्ट जारी केला असून कोकण व पश्चिम महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. (Heavy Rain in Maharashtra)
शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Heavy Rain in Maharashtra)
हवामान विभागाचा या जिल्ह्यांना अलर्ट
ऑरेंज अलर्ट : मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
यलो अलर्ट : पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नांदेड, हिंगोली, नागपूर, चंद्रपूर
विभागनिहाय हवामानाचा सविस्तर अंदाज
कोकण व घाटमाथा (मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग)
मुंबई, ठाणे, पालघर येथे हलक्या ते मध्यम सरींसह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे १००-१५० मिमीपर्यंत पावसाचा अंदाज असून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
समुद्राला मोठी भरती येणार असल्याने किनारपट्टी भागांमध्ये सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पश्चिम महाराष्ट्र (पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली)
पुणे आणि सातारा येथे ऑरेंज अलर्ट
मुसळधार पावसासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट
कोल्हापूर व सांगलीमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता
मराठवाडा (बीड, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव)
बीड, नांदेड, हिंगोली येथे रात्रीच्या सुमारास पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
धाराशिव व लातूर येथे मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे.
विदर्भ (नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया)
नागपूर, वर्धा येथे तुरळक जोरदार सरी बरसतील.
चंद्रपूर व गोंदिया येथे वादळी वारे (३०-४० किमी/ताशी) आणि मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्र (नाशिक, धुळे, जळगाव) येथे नाशिक, धुळे येथे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
जळगाव येथे ढगाळ वातावरण आणि तुरळक पावसाच्या सरी आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* पावसामुळे पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून पाण्याचा निचरा योग्यरित्या करा.
* साठवणुकीसाठी उघड्यावर ठेवलेला शेतमाल झाकून ठेवा.
* शेतीकामात आवश्यकता असेल तर पावसाच्या पूर्वसंध्येचा फायदा घ्या.
मच्छीमार बांधवांसाठी हवामान खात्याचा इशारा
कोकण किनारपट्टीवर (रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर) आणि मुंबई परिसरात समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे. तसेच, मोठ्या भरतीमुळे लाटांची उंची वाढू शकते. हवामान खात्याने पुढील २ दिवस समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.