अमिताभ बच्चन यांनी कपिल शर्माला दिला हा वैवाहिक जीवनाचा कानमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 07:15 AM2018-11-24T07:15:00+5:302018-11-24T07:15:01+5:30

१२ डिसेंबरला कपिल बोहल्यावर चढेल. या लग्नाचे आमंत्रण कपिल शर्माने खुद्द बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांना नुकतेच दिले.

Amitabh Bachchan gives marriage advice to Kapil Sharma on kaun banega crorepati show | अमिताभ बच्चन यांनी कपिल शर्माला दिला हा वैवाहिक जीवनाचा कानमंत्र

अमिताभ बच्चन यांनी कपिल शर्माला दिला हा वैवाहिक जीवनाचा कानमंत्र

googlenewsNext
ठळक मुद्देएका स्वयंसेवी संस्थेला मदत करण्यासाठी नुकताच कपिल शर्मा अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या मंचावर झळकला होता. कपिलचे लग्न काहीच दिवसांवर येऊन ठेपले असल्याने कपिलने अमिताभ बच्चन यांना या कार्यक्रमात सगळ्यांसमोरच लग्नाचे आमंत्रण दिले आणि अमिताभ बच्चन यांनी देखील हे आमंत्रण स्वीकारत लग्नाला येण्याचे कबूल केले. अमिताभ यांनी देखील कपिलला लगेचच सुखी संसाराचा कानमंत्र दिला. त्यांनी सांगितले की, सुखी वैवाहिक जीवन जगायचे असेल तर सॉरी हा शब्द सतत तुम्ही बोलणे गरजेचे आहे. तुमच्यात आणि पत्नीत काही तणाव निर्माण होतोय असे वाटले की लगेचच सॉरी म्हणून टाका... तसेच काहीही झाल

कपिल शर्मा येत्या १२ डिसेंबरला गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथसोबत लग्न करणार आहे. या पंजाबी लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. १० तारखेपासून या लग्नाचे विधी सुरू होतील. सर्वप्रथम १० तारखेला कपिलच्या बहिणीच्या घरी देवीचे जागरण आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी संगीत आणि यानंतर मेहंदी होणार आहे. १२ डिसेंबरला कपिल बोहल्यावर चढेल. या लग्नासाठी एक फाईव्ह स्टार हॉटेल बुक करण्यात आल्याचेही कळतेय. १४ डिसेंबरला अमृतसर येथील पंचतारांकित हॉटेलात कपिलचे ग्रॅण्ड रिसेप्शन होणार आहे. बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील मित्रांसाठी २४ तारखेला मुंबईत दुसरे रिसेप्शन ठेवण्यात आले आहे. या लग्नाचे आमंत्रण कपिल शर्माने खुद्द बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांना नुकतेच दिले.

एका स्वयंसेवी संस्थेला मदत करण्यासाठी नुकताच कपिल शर्मा अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या मंचावर झळकला होता. कपिलचे लग्न काहीच दिवसांवर येऊन ठेपले असल्याने कपिलने अमिताभ बच्चन यांना या कार्यक्रमात सगळ्यांसमोरच लग्नाचे आमंत्रण दिले आणि अमिताभ बच्चन यांनी देखील हे आमंत्रण स्वीकारत लग्नाला येण्याचे कबूल केले. तसेच त्याला लग्नासाठी शुभेच्छा देखील दिल्या. यानंतर कपिलने अमिताभ बच्चन यांना सुखी संसाराचा कानमंत्र विचारला. कपिलचा हा प्रश्न ऐकताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. अमिताभ यांनी देखील कपिलला लगेचच सुखी संसाराचा कानमंत्र दिला. त्यांनी सांगितले की, सुखी वैवाहिक जीवन जगायचे असेल तर सॉरी हा शब्द सतत तुम्ही बोलणे गरजेचे आहे. तुमच्यात आणि पत्नीत काही तणाव निर्माण होतोय असे वाटले की लगेचच सॉरी म्हणून टाका... तसेच काहीही झाले तरी सॉरी बोलतच राहा... यामुळे तुमचा संसार नक्कीच सुखी होईल. 

गेल्यावर्षी मार्चमध्ये ‘मिट माय वाईफ’ अशी पोस्ट टाकून कपिलने गिन्नीसोबतचे रिलेशन जग जाहीर केले होते. पण त्यानंतर काहीच महिन्यांत कपिल आणि गिन्नीच्या ब्रेकअपची बातमीही आली. कालांतराने ही बातमी अफवा असल्याचे सिद्ध झाले. गिन्नी आणि कपिल शर्मा दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. तिथेच दोघांची ओळख झाली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. गिन्नीसह कपिलने ‘हस बलिये’ या शोमध्येही एकत्र कामही केले आहे. 

Web Title: Amitabh Bachchan gives marriage advice to Kapil Sharma on kaun banega crorepati show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.