'भावड्या' गाण्यासाठी लागली तब्बल ५० किलो हळद !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 05:06 PM2018-08-29T17:06:39+5:302018-08-29T17:09:24+5:30

सुपरहिट फिल्म 'बकेट लिस्ट' चे निर्माते डार्क हॉर्स प्रोडक्शन्सचे जमाश्प बापुना व अमित पंकज पारीख प्रस्तुत, आणि नवविधा प्रोडक्शनचे जितेंद्र चीवेलकर यांची निर्मिती असलेला 'पार्टी' हा सिनेमा येत्या ७ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे

50 kg turmeric was needed for singing 'Chhoti' | 'भावड्या' गाण्यासाठी लागली तब्बल ५० किलो हळद !

'भावड्या' गाण्यासाठी लागली तब्बल ५० किलो हळद !

googlenewsNext
ठळक मुद्देपार्टी' या सिनेमाच्या गाण्याला सर्वत्र तुफान प्रसिद्धी मिळत आहे

सुपरहिट फिल्म 'बकेट लिस्ट' चे निर्माते डार्क हॉर्स प्रोडक्शन्सचे जमाश्प बापुना व अमित पंकज पारीख प्रस्तुत, आणि नवविधा प्रोडक्शनचे जितेंद्र चीवेलकर यांची निर्मिती असलेला 'पार्टी' हा सिनेमा येत्या ७ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. सचिन दरेकर दिग्दर्शित मैत्रीची परिभाषा मांडणारा हा सिनेमा जितका धम्माल आहे, अगदी तितकेच या सिनेमातील 'भावड्या' हे गाणे आहे ! या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे, संगीतसृष्टीतील दोन मित्रांनी, मैत्रीवर आधारित असलेले हे गाणे, खास मित्रांसाठी सादर केले आहे. अवधूत गुप्ते आणि अमितराज या जुन्या मित्रांचे हे गाणे मित्रांसाठी पर्वणी ठरत आहे. 'पार्टी' या सिनेमाच्या गाण्याला सर्वत्र तुफान प्रसिद्धी मिळत आहे. अमितराजच्या चालीवर अवधूतने गायलेल्या या गाण्याचे लिखाण सुप्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर यांनी केले असून, कोरियोग्राफर उमेश जाधवने या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. हळदीचे हे भन्नाट गाणे, प्रेक्षकांना नादखुळा करून सोडत आहे. या गाण्याचे चित्रीकरण रात्रीचे असल्याकारणामुळे, सलग दोन रात्र सर्व कलाकारांना काम करावे लागले होते. शिवाय, गाण्यात हळदीचा माहोल उभा करण्यासाठी तब्बल ५० किलो हळदीचा वापर यात करण्यात आला असल्याचे समजते. उडत्या चालीचे हे गाणे इतके जोशपूर्ण आहे कि, या गाण्याची झिंग चित्रीकरण संपल्यानंतरही उतरली नव्हती. कारण, रात्रभर काम करूनदेखील 'पार्टी' च्या सर्व टीमने हे गाणे सेटवर मोठ्या आवाजात लावत, संपूर्ण क्र्यू मेंबरसोबत ताल धरला होता. शिवाय, उरलेली हळद उधळवत या गाण्याची मज्जादेखील लुटली.

या सिनेमातील आणखीन एक गाणे प्रेक्षकांना मोहित करून सोडत आहे. 'काळजात घंटी वाजते' हे 'पार्टी' सिनेमातील रोमेंटिक गाणे तरुणवर्गामध्ये हिट ठरले आहे. सिनेमातील चार मित्रांच्या खाजगी आयुष्यातील गुलाबी प्रसंग या गाण्यांत दिसून येतात. फ्रेश आणि युथफुल असलेले हे गाणे स्वतः अमितराजने गायले असून, त्याला निहिरा जोशी या गायिकेने सुबक साथ दिली आहे. प्रेमाच्या गुलाबी दुनियेची रंजक सफर करणारे हे गाणे 'पार्टी' सिनेमाच्या कथानकाला चारचाँद लावणारे ठरत आहे. अश्या या धम्माल 'पार्टी'चा रंग चढवणाऱ्या सिनेमात,  सुव्रत जोशी, अक्षय टंकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर, प्राजक्ता माळी आणि मंजिरी पुपाला प्रमुख भूमिकेत असून, या सहाजणांची फक्कड मैत्री दाखवणारा हा सिनेमा आहे. 

 

Web Title: 50 kg turmeric was needed for singing 'Chhoti'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.