विराट-अनुष्का झाले वेगळे?

By Admin | Published: February 2, 2016 12:54 PM2016-02-02T12:54:26+5:302016-02-02T13:18:54+5:30

विराट-अनुष्काने एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याने त्यांच्या ब्रेकअपची चर्चा जोर धरू लागली आहे.

Virat-Anushka became different? | विराट-अनुष्का झाले वेगळे?

विराट-अनुष्का झाले वेगळे?

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - बॉलिवूडमध्ये सध्या ब्रेकअपचा मौसम सुरू आहे. फरहान-अधुना, रणबीर-कतरिनानंतर आता अभिनेत्री अनुष्का शर्मा- क्रिकेटर विराट कोहली यांच्यात काहीही आलबेल नसल्याचे वृत्त आहे. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले या लव्हबर्ड्सनी एकमेकांना इन्स्टाग्रामसह इतर सोशल नेटवर्किंग साइट्सवरही अनफॉलो केल्याने त्यांच्या ब्रेक-अपची चर्चा जोर धरू लागली आहे. तसेच विराटचा लग्नाचा प्रस्तावही अनुष्काने फेटाळल्याचे समजते.
काही वर्षांपूर्वी एका शाम्पूच्या जाहिरातीदरम्यान विराट आणि अनुष्काची ओळख झाली आणि थोड्याच दिवसात ते चांगले मित्र झाले. मात्र काही दिवसांनी ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या फिरू लागल्या. अनुष्काच्या मुंबईतील घराच्या पार्किंग लॉटमध्ये त्या दोघांना रात्री उशीरा एकत्र पाहिल्याचे एका फॅनने नमूद केले. पण त्या दोघांनीही आपल्या रिलेशनशीपबद्दल मौन सोडले नव्हते. 
मात्र विराटच्या एक मॅचसाठी अनुष्काने हजेरी लावल्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब झाले. भारतीय संघाच्या वर्ल्डकपमधील सामन्यादरम्यानही अनुष्का शर्मा उपस्थित होती. त्यांच्या या जोडीमुळे त्यांचे चाहते खूपच खुश झाले. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या फिरत असून इन्स्टाग्रामवर त्यांनी एकमेकांना अनफॉलो केल्याने ब्रेकअपची चर्चा जोर धरू लागली आहे. 

Web Title: Virat-Anushka became different?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.