आमचे नाते टिकवण्यासाठी मी बरेच प्रयत्न केलेत! अरबाज खान अखेर बोलला!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 09:04 PM2018-10-29T21:04:19+5:302018-10-29T21:05:34+5:30

अरबाज खान आणि मलायका अरोरा हे एकेकाळचे सर्वाधिक रोमॅन्टिक कपल होते. पण लग्नानंतर १७ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर दोघांनीही अचानक वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

Arbaaz Khan Talks About Failed Marriage With Malaika Arora |  आमचे नाते टिकवण्यासाठी मी बरेच प्रयत्न केलेत! अरबाज खान अखेर बोलला!!

 आमचे नाते टिकवण्यासाठी मी बरेच प्रयत्न केलेत! अरबाज खान अखेर बोलला!!

अरबाज खान आणि मलायका अरोरा हे एकेकाळचे सर्वाधिक रोमॅन्टिक कपल होते. पण लग्नानंतर १७ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर दोघांनीही अचानक वेगळे होण्याचा निर्णय घेतला. केवळ वेगळेच नाही तर एकमेकांपासून घटस्फोटही घेतला. या घटस्फोटानंतर वेगवेगळ्या चर्चा रंगल्या. (अर्जुन कपूरमुळे मलायकाने अरबाजसोबत घटस्फोट घेतला, असे काय काय म्हटले गेले.) अर्थात मलायका व अरबाज यापैकी कुणीही या विषयावर कधीही बोलले नाही. मात्र अलीकडे एका मुलाखतीत अरबाज त्याच्या व मलायकाच्या नात्यावर बोलला. ‘मी तब्बल २१ वर्षे हे नाते टिकवण्यासाठी प्रयत्न केलेत. पण ते टिकू शकले नाही’, अशी भावना अरबाजने व्यक्त केली.  आपण कोणत्याही गोष्टीत कधीच परिपूर्ण असू शकत नाही. आयुष्यात अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. मीदेखील २१ वर्षे आमचे नाते टिकवण्याचा प्रयत्न केला, पण ठिक आहे. यापेक्षा जास्त काळ कोणीही प्रयत्न करू शकणार नाही, असेही अरबाज म्हणाला. 
घटस्फोटानंतर अरबाज आणि मलायका दोघेही आपआपल्या आयुष्यात स्थिरावले आहेत. स्थिरावले म्हणण्यापेक्षा  त्यांच्या आयुष्यात बरेच पुढे निघून गेले आहेत. अरबाजचे नाव त्याची ईटालियन गर्लफ्रेन्ड जॉर्जिया अ‍ॅन्ड्रियानीसोबत जोडले जात आहे, तर मलायका अर्जून कपूरला डेट करत असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. एकीकडे अर्जून कपूर आणि मलायका लवकरच लग्न करणार अशी चर्चा आहे तर दुसरीकडे अरबाजही लवकरच लग्नबेडीत अडकणार असे मानले जात आहे.

Web Title: Arbaaz Khan Talks About Failed Marriage With Malaika Arora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.