Next

बेस्ट कामगारांचा लढा यशस्वी, कामगारांचा एकच जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 04:58 PM2019-01-16T16:58:09+5:302019-01-16T16:58:46+5:30

मुंबई -  बेस्ट  कर्मचाऱ्यांनी आठ दिवसांनंतर संप मागे घेतला आहे.  बेस्ट  कामगारांचे नेते शशांक राव यांनी संप मागे घेतल्याची ...

मुंबई -  बेस्ट  कर्मचाऱ्यांनी आठ दिवसांनंतर संप मागे घेतला आहे.  बेस्ट  कामगारांचे नेते शशांक राव यांनी संप मागे घेतल्याची घोषणा केली. तसेच प्रशासनाने मागण्या मान्य केल्या असून कामगारांच्या पगारात किमान 7 हजार रुपयांची वाढ होईल, असेही राव यांनी यावेळी सांगितले. कामगार जिंकला, कामगार एकजुटीचा विजय असो, या घोषणांनी वडाळा बस डेपोचा परिसर दणाणून गेला होता. तर, कामगारांच्या चेहऱ्यावर 8 दिवसांनी आनंद दिसत होता. 

टॅग्स :बेस्टBEST