Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी असेल किंवा कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल जेवणाची यात महत्वाची भूमिका असते. पण केवळ पौष्टिक खाऊनही तुम्ही वजन कमी करू शकत नाही. कारण पौष्टिक खाण्यासोबतच जेवणाची वेळही तेवढीच महत्वाची असते. त्यात रात्रीच्या जेवणाची वेळ वजन कमी करण्यावर खूप प्रभाव टाकते. कारण जेवणाची वेळ, पचनक्रिया, फॅट स्टोरेज आणि भूक कंट्रोल या सगळ्या गोष्टींचा वजनाशी संबंध असतो. अशात तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ तुम्हाला माहीत असली पाहिजे.
अनेक हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, रात्री ७ वाजताच्या आज जेवण केलं पाहिजे. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी हे महत्वाचं ठरतं. अक्षय कुमार आणि इतरही अनेक सेलिब्रिटीबाबत याबाबत बोलले आहेत. पण बऱ्याचदा काही कारणानं रात्री जेवण करायला उशीर होतोच.
वजन कमी करण्यासाठी जेवणाची योग्य वेळ
जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर रात्रीचं जेवण ७ वाजता किंवा त्याआधी केलं पाहिजे. याचं कारण म्हणजे आपलं मेटाबॉलिज्म सायंकाळी स्लो होऊ लागतं आणि त्यामुळे अन्न पचन करण्यासाठी शरीराला जास्त मेहनत करावी लागते. तेच जर तुम्ही लवकर जेवण केलं तर अन्न होण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो, त्याचा फायदा वजन कमी करण्यात होतो.
रात्री लवकर जेवण्याचे फायदे
पचन चांगलं होतं
सायंकाळी ७ वाजता जेवण केल्यानं पचन तंत्राला झोपण्याआधी अन्न पचवण्यासाठी ३ ते ४ तासांचा वेळ मिळतो. त्यामुळे अॅसिडिटी, अपचन आणि ब्लोटिंग अशा समस्याही कमी होतात.
मेटाबॉलिज्म अॅक्टिव राहतं
रात्री उशीरा जेवण केलं तर मेटाबॉलिज्म स्लो होतं, त्यामुळे कॅलरी बर्न करण्याची प्रोसेसही स्लो होते. लवकर जेवण कराल तर मेटाबॉलिज्म योग्यपणे काम करतं आणि वजन कमी करण्यास मदत मिळते.
झोपेची क्वालिटी सुधारते
रात्री उशीरा आणि जड काही खाल्लं तर यामुळे झोप प्रभावित होते. ७ वाजता जेवण केल्यानं पचन चांगलं होतं आणि त्यामुळे झोपेची क्वालिटी सुद्धा सुधारते. झोप चांगली झाली तर वजन कमी करण्यास मदत मिळते.
इन्सुलिन सेन्सिटिविटी सुधारते
रात्री उशारी जेवण केल्यानं ब्लड शुगर लेव्हल अचानक वाढू शकते. अशात लवकर जेवण केलं तर इन्सुलिन सेन्सिसिविटी सुधारते, ज्यानं वजन कमी करण्यास मदत मिळते.
उशीरा जेवत असाल तर काय कराल?
अनेकदा काम किंवा एखाद्या वेगळ्या कारणानं रात्री ९ किंवा त्यापेक्षाही उशीरा जेवण करावं लागतं. अशात काही गोष्टींची काळजी घेतली गेली पाहिजे.
- रात्री तळलेलं, जड आणि मसालेदार काही खाऊ नका. त्याऐवजी सूप, डाळ, हिरव्या पालेभाज्या, चपाती खा.
- रात्रीच्या जेवणात कार्बोहायड्रेट (जसे की भात, बटाटे) कमी प्रमाणात खा आणि प्रोटीन व फायबर जसे की, डाळी, पनीर, सलाद यांचा आहारात समावेश करा.
- जेवण झाल्यावर साधारण १५ ते २० मिनिटं चाललं पाहिजे. यानं पचनक्रिया चांगली होते आणि झोपही चांगली लागते.
- जेवण आणि झोपण्यात अंतर आरोग्यासाठी महत्वाचं असतं. झोपण्याच्या साधारण २ तासांआधी जेवण केलं पाहिजे. जेवल्यावर लगेच झोपाल तर अन्न पचत नाही.
- रात्री खूप जास्त पाणी पिणं सुद्धा टाळलं पाहिजे. हलकं कोमट पाणी किंवा आल्याचा चहा पिऊ शकता. यानं पचन चांगलं होईल.