Join us
Daily Top 2 Weekly Top 5

कायम भात खातात तरी साऊथच्या लोकांचे वजन का वाढत नाही? भात शिजवण्याची पद्धत कोणती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 17:03 IST

1 / 10
दक्षिण भारतात (South Indian) भात हे प्रमुख अन्न आहे. तरीही येथील लोक अनेक पारंपारीक पद्धतींचा वापर करून आपले वजन नियंत्रणात ठेवतात. कोणत्या पद्धतीनं भात शिजवल्यास तब्येत चांगली राहते समजून घेऊ. (How To Eat White Rice And Still Maintain A Healthy Weight)
2 / 10
दक्षिण भारतातील अनेक कुटूंबांमध्ये भात प्रेशर कुकरऐवजी उघड्या पातेल्यात शिजवला जातो आणि त्यावरील अतिरिक्त पाणी काढून टाकलं जातं.
3 / 10
तज्ज्ञांच्यामते भातातील हे स्टार्चचे पाणी काढून टाकल्यानं कॅलरीज आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी होण्यास मदत होते ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका कमी होतो.
4 / 10
अनेक पारंपारीक दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये पॉलिश न केलेल्या किंवा कमी पॉलिश असलेल्या तांदळाचा वापर केला जातो.
5 / 10
ब्राऊन राईस किंवा पारंपारीक तांदळाच्या प्रकारांमध्ये पांढऱ्या पॉलिश तांदळापेक्षा तंतुमय पदार्थ आणि पोषक द्रव्य जास्त असतात तसंच त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. ज्यामुळे ग्लुकोज हळूहळू मिसळते आणि वजन कंट्रोलमध्ये राहतं.
6 / 10
भातासोबत भरपूर भाज्या, सांबार, रस्सम आणि दही यांचा समावेश असतो. हे कॉम्बिनेशन जेवणामध्ये प्रथिनं, तंतुमय पदार्थ आणि एंटी ऑक्सिडेंट्स वाढवतात. यामुळे पोट लवकर भरतं आणि संतृष्ट वाटते. पचनक्रिया सुधारते आणि भातामुळे मिळणाऱ्या एकूण कॅलरीजचे संतुलन राखले जाते.
7 / 10
दक्षिण भारतीय स्वंयपाकात नारळाचे तेल सामान्यत: वापरले जाते. ज्यामध्ये ट्रायग्लिसराईड्स असतात.
8 / 10
नारळाचे तेल भाताच्या पचनाची प्रक्रिया मंदावते ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी अचानक वाढत नाही आणि शरीरात चरबी जमा होण्यास प्रतिबंध होतो.
9 / 10
अनेक दक्षिण भारतीय लोक ज्वारी, बाजरी, नाचणी यांसारख्या मिलेटे्सचा आहारात समावेश करातात. जे फायबर्स आणि पोषक तत्वांनी समृद्ध असतात.
10 / 10
आहाराच्या सवयी आणि आहार घेण्याच्या, पदार्थ तयार करण्याच्या पद्धती यावर वजन वाढणार की नाही हे अवलंबून असते.
टॅग्स : वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य