By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 13:16 IST
1 / 8आयुर्वेदानुसार शरीरात ३ मुख्य दोष असतात. वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांचे संतुलन व्यवस्थित ठेवण्यासाठी आरोग्य चांगलं असणं खूपच महत्वाचे असते. यापैकी कोणत्याही एका दोषाचे असंतुलन झाल्यास बऱ्याच तब्येतीच्या समस्या उद्भवू शकतात. (Hidden Symptoms Of Vata Disturbance)2 / 8गुडघे, कंबर आणि हातापायांच्या सांध्यांमध्ये वेदना होणं आणि सांधे जखडल्यासारखं वाटणं.3 / 8पुरेशी विश्रांती घेऊनही शरीरात उत्साह न वाटणं आणि सतत थकवा, अशक्तपणा जाणवणे.4 / 8उठताना किंवा बसताना सांध्यांमधून कटकट असा आवाज येणं अशी समस्या वात वाढल्यावर उद्भवते. 5 / 8 विनाकारण चिंता वाटणं किंवा मन एका जागी स्थिर न राहणं हे वात दोष वाढल्याचं लक्षण आहे.6 / 8त्वचा, ओठ आणि टाचांना जास्त प्रमाणात भेगा पडणं किंवा त्वचा निस्तेज दिसणं7 / 8वारंवार गॅस होण, पोट फुगणं आणि बद्धकोष्टतेचा त्रास वाढणं हे शरीरातील वात वाढल्याचं लक्षण आहे.8 / 8शरीरात वात दोष बिघडला किंवा वाढला तर रात्री झोप लागत नाही लागली तरी अर्धवट आणि अस्वस्थ वाटते.