मोहक हास्याने रसिकांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे रेणुका शहाणे. रेणुकाच्या हास्यामध्ये जे माधुर्य, साधेपणा आणि समोरच्याला आपलंसं करण्याची जी शक्ती आहे, ती सहजासहजी कुठे दिसत नाही, असं तिच्या चाहत्यांना नेहमीच वाटतं. तिची 'सुरभी' मालिका आणि 'हम आपके है कौन' मधली 'पुजा भाभी' आजही रसिकांच्या मनात कोरलेली आहे. आता तिच्यासारख्या मोठ्या अभिनेत्रीला तेच टोमणे किंवा सल्ले ऐकावे लागले जे सर्वसामान्य महिलांना नेहमीच ऐकावे लागतात. रेणुकाच काय पण करिना कपूर, ऐश्वर्या राय यांच्यासारख्या सेलिब्रिटीही त्या चक्रातून सुटलेल्या नाहीत. बाईचं शरीर म्हटल्यावर ते याच मापात असावं, त्याच प्रमाणात असावं, अशी जी काय आकडेमोड आपल्या समाजाच्या डोक्यात आहे, त्यातूनच टोमण्यांचा, सल्ल्यांचा जन्म होतो. रेणुकालाही तिच्या वाढलेल्या वजनाविषयी असाच फुकटचा सल्ला मिळाला हाेता आणि तो ही तिच्या जवळच्या व्यक्तीकडूनच.. बघा नेमका काय प्रसंग होता तो..(actress Renuka Shahane shared that she was asked to lose weight just after her delivery)
गौहर खान यांच्या पॉडकास्टमध्ये रेणुका शहाणेची काही दिवसांपुर्वी एक मुलाखत झाली होती. यावेळी रेणुकाने मातृत्व, गरोदरपणा, बाळंतपण याविषयी तिचे काही अनुभव सांगितले. यामध्ये रेणुका म्हणाली की २००१ मध्ये तिचं आणि आशुतोष राणा यांचं लग्न झालं. त्यानंतर वर्षभरातच तिला पहिला मुलगा झाला.
घरात भाजीच नाही? २ कांदे घेऊन 'या' पद्धतीने करा भाजी- नेहमीपेक्षा खूपच वेगळी, चवदार होईल
त्यावेळी ती ३५ वर्षांची होती. आता बाळ झालं म्हटल्यावर आपल्याकडे जसे बाळ- बाळंतिणीला भेटायला पाहुणे येतात तसेच तिच्याकडेही आले. आशुतोषचा एक जवळचा मित्र त्याच्या बायकोसोबत रेणुकाला आणि बाळाला भेटायला आला होता.
पाण्याची बाटली उघडा, बांगड्या भरून झाकण लावून टाका! बघा बँगल बॉक्स तयार करण्याचं देसी जुगाड
बाळाला पाहिल्यानंतर त्याने नजर रेणुकाकडे वळवली आणि लगेचच आता मात्र वजन घटवायला हवं हां असं सांगून तो मोकळा झाला. वास्तविक पाहता त्याने ही गोष्ट रेणुकाला सांगण्याची काही गरजच नव्हती. पण तरीही आपल्याकडे लोकांची फुकटचा सल्ला देण्याची सवय जात नाही.
रेणुका म्हणते मी नुकताच बाळाला जन्म दिला होता. अजून काही तासही उलटलेले नव्हते. माझं मलाच काही सुधरत नव्हतं आणि त्याचवेळी हा सल्ला येऊन माझ्या कानांवर आदळला.
पावसाळ्यात विजेचं करंट लागण्याचा धोका वाढतो! घरातल्या 'या' वस्तू वापरताना विशेष काळजी घ्या
हा अनुभव बहुतांश महिलांना येतोच. ज्यांचा त्यांच्याशी काहीही संबंध नसतो, असे लोकही उगाच येऊन वजन कमी करण्याचा, वाढविण्याचा सल्ला देऊन जातात. मुळात आपल्याकडे खूप दिवसांनंतर झालेल्या कोणत्याही भेटीची सुरुवात 'अगं तब्येत चांगलीच सुधरली गं', 'का गं किती बारीक झालीस' अशाच वाक्यांनी होते. ही सगळी वजनाची आकडेमोड प्रत्येकाने स्वत:पुरतीच मर्यादित ठेवली तर काय बिघडतं बरं..