Daily water rules for youthfulness: पाणी पिणं आपल्यासाठी किती महत्वाचं ठरतं हे यावरून समजून येतं की, वेगवेगळे हेल्थ एक्सपर्ट सतत पाणी पिण्याबाबत वेगवेगळे सल्ले देत असतात. ते फक्त दिवसभर ७ ते ८ ग्लास पाणी प्या इतकंच सांगत नाही तर पाणी पिण्याची योग्य पद्धतही सांगतात. कारण फायदे मिळवायचे असतील तर नुसतं पाणी भागत नाही, पद्धतही महत्वाची ठरते. पाणी पिण्याच्या काही पद्धती फॉलो करून तुम्ही वाढत्या वयाची लक्षणं कमी करू शकता. म्हणजे जर तुम्ही काही नियम पाळले तर तुम्ही ४० वयातही २५ चे दिसू शकाल.
चेहऱ्यावर नेहमी ग्लो हवा असेल, फ्रेश दिसायचं असेल, एनर्जी हवी असेल आणि मन नेहमी आनंदी ठेवायचं असेल तर ४ गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. सायकॉलॉजिस्ट आणि हीलिंग एक्सपर्ट डॉ. मदन मोदी यांनी इन्स्टाग्रामवर पाणी पिण्याचे चार नियम सांगितले आहेत. जे फॉलो करून चेहरा नेहमी तरूण दिसू शकेल.
पाणी पिण्याची योग्य पद्धत आणि वेळ
दिवसाची सुरूवात पाण्यानं करा
डॉ. मोदी सांगतात की, सकाळी झोपेतून उठल्यावर सगळ्यात आधी कमीत कमी एक ग्लास पाणी प्यावं. यानं शरीरातील विषारी तत्व तर बाहेर पडतातच, सोबतच झोपेदरम्यान स्लो झालेलं मेटाबॉलिज्म सुद्धा अॅक्टिव होतं.
सकाळी प्यायलेलं पाणी लिव्हर, किडनी आणि त्वचेा रिफ्रेश करतं. यानं बद्धकोष्ठता, अॅसिडिटी सारख्या समस्या दूर होतात. हवं तर तुम्ही कोमट पाणी पिऊ शकता. कोमट पाण्यानं पोट आणि त्वचा दोन्ही साफ होईल.
एक एक घोट प्या
डॉक्टर सांगतात की, एकदम ढसाढसा पाणी पिण्याऐवजी आरामात एक एक घोट घेत पाणी प्यावं. असं केल्यास लाळ पोटात पाण्यासोबत जास्त जाईल, ज्यामुळे पचन तंत्र मजबूत होतं. तसेच यानं मायग्रेन आणि डोकेदुखीची समस्याही दूर होण्यास मदत मिळू शकेल.
थंड पाणी पिणं टाळा
डॉक्टर म्हणाले की, कितीही तापमान वाढलेलं असेल किंवा गरम होत असेल, घसा कोरडा पडला असेल तरी फ्रिजमधील थंड पाणी पिणं टाळावं. थंड पाणी प्यायल्यास डायजेस्टिव सिस्टीम स्लो होतं आणि मेटाबॉलिज्मही स्लो होतं. त्याऐवजी मातीच्या मडक्यातील पाणी प्या किंवा फिल्टरचं नॉर्मल पाणी प्या. यानं शरीराचं तापमान बॅलन्स होतं.
जेवणाच्या आधी आणि नंतर पाणी टाळा
डॉ. मोदी सांगतात की, जेवणाच्या एकदम आधी किंवा जेवण झाल्यावर लगेच पाणी पिणं नुकसानकारक ठरू शकतं. असं केल्यानं पचनक्रिया कमजोर होते आणि पोट फुगण्यासारख्या समस्या होतात. त्यामुळे जेवणाच्या ३० मिनिटं आधी आणि ३० मिनिटांनंतर पाणी प्यावं. तसेच उभे राहून कधीच पाणी पिऊ नये. पाणी नेहमी खाली बसूनच प्यावे.
डॉ. मोदी यांचं मत आहे की, जर पाणी पिण्याचे हे चार नियम फॉलो केले गेले तर त्वचेवर ग्लो येईल, सुरकुत्या दूर होतील, पोट निरोगी राहील, मायग्रेन आणि त्वचेसंबंधी अनेक समस्या दूर होतील. अशात जर तुम्हाला चाळिशीतही २५चं दिसायचं असेल तर हे नियम नक्की फॉलो करा.