सध्याच्या बदलत्या काळात काही आजार असे आहेत जे फारच कॉमन झाले आहेत, डायबिटीस हा त्यापैकीच एक. डायबिटीस फारच कॉमन असला तरी तितकाच गंभीर आजार आहे. डायबिटीस (Dietitian Shares 3 Best Vegetables To Control Diabetes Naturally) झाल्यावर योग्य आहार आणि जीवनशैलीत बदल करून यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. जर डायबिटीस वेळीच नियंत्रित केला नाही तर डोळे, मूत्रपिंड, हृदय आणि इतर अवयवांना ( 3 Best Vegetables for Diabetes) नुकसान पोहोचवू शकते. असे असले तरी एक चांगली गोष्ट म्हणजे काही नैसर्गिक पद्धतींनी, विशेषतः योग्य आहाराद्वारे, रक्तातील साखर मोठ्या प्रमाणात नियंत्रित केली जाऊ शकते, ज्यामुळे डायबिटीसवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते(Expert Advice Top 3 Veggies for Diabetes Control).
आहारात समाविष्ट केल्या जाणाऱ्या काही भाज्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. आहारतज्ज्ञ श्वेता पांचाळ यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, त्यांनी अशा ३ भाज्यांबद्दल सांगितले आहे, ज्या नैसर्गिकरित्या डायबिटीस नियंत्रित करण्यास अधिक मदत करतात. यासाठीच, डायबिटीस असणाऱ्यांनी आपल्या आहारात नेमक्या कोणकोणत्या भाज्यांचा समावेश आवर्जून करायला हवा ते पाहूयात.
डायबिटीस असणाऱ्यांनी या ३ भाज्या खायलाच हव्यात...
१. भेंडी :- डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी भेंडी अत्यंत उपयुक्त मानली जाते. आहारतज्ज्ञांच्या मते, भेंडीमध्ये सोल्युबल फायबर्स (soluble fiber) जास्त प्रमाणात असतात, जे रक्तातील साखर अचानक वाढू देत नाहीत. यामुळे साखरेचे शोषण कमी होते आणि इन्सुलिनची पातळी मेंटेन राहण्यास मदत होते. भेंडीमध्ये 'लेक्टिन' नावाचे संयुग असते, जे रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते. तसेच, भेंडीमध्ये फायबर्स आणि 'म्यूसिलेज' असते, जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. भेंडीच्या पाण्यात 'लेक्टिन' नावाचे संयुग असते, जे रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते. या सर्व गुणधर्मांमुळे भेंडी डायबिटीस नियंत्रणासाठी एक उत्तम अशी भाजी ठरते.
संशोधनाचा दावा, कंबरेचा घेर सांगतो हार्ट ॲटॅक येण्याचा धोका, मोजा तुमची कंबर आहे किती...
२. कारले :- डायबिटीसवर रामबाण उपाय म्हणून कारले ओळखले जाते. कारल्याची भाजी, रस किंवा इतर पदार्थ खाणे हे डायबिटीसच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर ठरते. कारल्यात असलेले 'चार्टिन' आणि 'पॉलीपेप्टाइड-पी' सारखी संयुगे नैसर्गिक पद्धतीने इन्सुलिन म्हणून काम करतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. यासाठीच, डायबिटीस असणाऱ्यांनी आहारात कारल्याच्या भाजीचा आवर्जून समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.
डायबिटिस असेल तर पोहे खाणं कितपत सुरक्षित? पोषणतज्ज्ञ सांगतात, खायचेच असतील तर पोहे ‘असे’ खा...
३. कोहळा :-मधुमेह नियंत्रणासाठी कोहळा अत्यंत उपयुक्त आहे. आहारतज्ज्ञांच्या मते, कोहळ्यात भरपूर फायबर्स असतात, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात. सकाळी रिकाम्या पोटी कोहळ्याचा रस घेतल्याने HbA1c पातळी कमी होण्यास मदत होते. यकृताचे डिटॉक्सिफिकेशन करते, ज्यामुळे चयापचय सुधारतो आणि मधुमेहाच्या रुग्णांना फायदा होतो. यात असलेले 'चार्टिन' आणि 'पॉलीपेप्टाइड-पी' सारखी संयुगे नैसर्गिक पद्धतीने इन्सुलिन म्हणून काम करतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. कोहळा कमी कॅलोरीयुक्त आणि फायबर्सने भरपूर असल्यामुळे वजन नियंत्रणासाठी देखील उपयुक्त आहे. यात असलेले अँटीऑक्सिडंट्स मधुमेहाच्या दुष्परिणामांपासून संरक्षण करतात.