Health Tips : जास्तीत जास्त लोकांचा हाच समज असतो की, फ्रिजमध्ये ठेवलेल्या गोष्टी जास्त दिवस फ्रेश राहतात. पण हा त्यांचा गैरसमज असतो. कारण फ्रिजमध्ये जास्त दिवसांपासून ठेवलेल्या गोष्टी खाल्ल्या तर तब्येत बिघडू शकते. अशात न्यूट्रिशनिस्ट रिता जैन यांनी सांगितलं की, काही अशा गोष्टी असतात ज्या २४ तासांपेक्षा जास्त फ्रिजमध्ये ठेवू नये. असं केलं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. त्या कोणत्या गोष्टी आहेत हे जाणून घेऊया.
सोललेला लसूण
लसूण वेगवेगळ्या पदार्थांची टेस्ट वाढवण्यासाठी टाकला जातो. पण तुम्हाला माहीत नसेल की, सोललेला किंवा बारीक केलेला लसूण २४ तासांपेक्षा जास्त फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यात 'बोटुलिज्म' नावाचे बॅक्टेरिया वाढतात. जे आरोग्याचं नुकसान करतात. त्यामुळे गरजेनुसार लसूण सोला किंवा न सोलताच फ्रिजमध्ये ठेवा.
कापलेला कांदा
कापलेला कांदा लगेच वापरला गेला पाहिजे. कापलेला कांदा जर जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेवला तर तो चिमतो आणि त्यात नुकसानकारक बॅक्टेरिया वाढतात. ज्यामुळे फूड पॉयजनिंगचा धोका वाढतो. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कांदा कापाल तर तो लगेच संपवा.
कापलेलं आलं
आलं सुद्धा लसूण आणि कांद्यासारखंच असतं. कापलेलं किंवा पेस्ट केलेलं आलं फ्रिजमध्ये ठेवलं जातं. फ्रिजमध्ये ठेवलेली आल्याची पेस्ट वाळते आणि त्यात फंगस होण्याचा धोका असतो. फंगसमुळे आरोग्याचं नुकसान होतं. त्यामुळे आलं गरजेनुसारच कापा.
शिजवलेला भात
शिजवलेला भात सुद्धा २४ तासांपेक्षा जास्त फ्रिजमध्ये ठेवू नये. भातामध्ये बॅसिलस सेरेस नावाचे बॅक्टेरिया असतात. जर भात रूम टेम्प्रेचर किंवा फ्रिजमध्ये जास्त वेळ ठेवत असाल तर बे बॅक्टेरिया अधिक वाढतात आणि विषारी तत्व सोडतात. अशात हा भात खाल्ल्यास उलटी किंवा जुलाब होण्याचा धोका असतो.