पाऊस पडायला लागला की हात लगेच बेसन पीठाच्या पुडीकडे वळतो. आई जरा भजी सोड गं!! असा आवाज ऐकू येतो. (Eat vadapav and pakoda during monsoon, but keep these 4 things in mind, remember to take care, health tpis)घरोघरी पावसाळ्यात वडा, भजी, समोसा एकंदरीत तळणीच्या पदार्थांची दावत असते. रस्त्यातून जाता जाता वडापाव तळताना काका कोणी दिसले की पाऊलं आपोआप त्या दिशेला वळतात.
पावसाळ्यात असे तेलकट तळलेले खाऊ नका असे डॉक्टरांनी कितीही ओरडून सांगितले तरी ये दिल है के मानता नही!! आता चहा , तळणीचे पदार्थ मनसोक्त खाऊन झाल्यावर मात्र पोटात गुडगुड होते आणि मग पोट खराब होणे, अपचन होणे, पित्ताचा त्रास अशा समस्या उद्भवतात. वडापाव , भजी खाणे तर कोणी सोडणार नाही. मात्र थोडी काळजी तर आपण नक्कीच घेऊ शकतो. पोटभर तळणीचे पदार्थ खाल्यावर आणि खाण्याआधी फक्त थोडी काळजी घ्यायची. म्हणजे मग अन्न बाधणार नाही. आणि खाल्याबद्दल पश्चातापही होणार नाही.
१. काहीही तेलकट खाण्याआधी भरपूर पाणी प्यायचे. पाण्यामुळे भूक जरा कमी होते आणि ओव्हरइटिंग होत नाही. तसेच तेलामुळे पोट साफ होण्यात अडथळा येतो. पाण्यामुळे पोट साफ होण्यासाठी मदत होते.
२. कधीही उठसूट तेलकट खायचे नाही. सकाळी उठल्याउठल्या किंवा अगदी झोपायच्या थोडे आधी तेलकट पदार्थ खाल्याने पित्ताचा त्रास होतो. छातीत जळजळायला लागते. तसेच पोटात गॅस होतो आणि ब्लोटिंगही होऊ शकते. अपचन होते. त्यामुळे संध्याकाळी, दुपारच्या जेवणासोबत असे पदार्थ खाल्ले जातात. तुम्हीही त्याच वेळेत खा.
३. सलग दोन ते तीन दिवस असे पदार्थ खाऊ नयेत. मधे काही दिवसांचा कालावधी जाऊ द्यायचा. म्हणजे पोटावर ताण येणार नाही. तसेच विकत पेक्षा घरीच तयार करुन खा. विकतचे तेल चांगल्या दर्जाचे नसते. तसेच पदार्थ उघडे ठेवलेले असतात. घरी केलेले चवीलाही मस्त असतात आणि तेलकट कमी होतात.
४. भजी, वडा खाल्यानंतर पोटाला पचनासाठी उपयुक्त ठरेल असे काही प्यायचे. जसे की ताक, दहीभात एक पदार्थ तळणीचा असेल तर ताटातील इतर पदार्थ पचनासाठी उपयुक्त ठरणारे असायला हवेत. असे करुन अपचन टाळता येईल.