… म्हणून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अखंड  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 06:12 PM2020-05-19T18:12:46+5:302020-05-19T18:13:09+5:30

कामगार विभागामुळे पुरवठा साखळी अभेद्य; रोज १७ हजार माथाडी कामगार गाळतात घाम

… So the supply of essentials is uninterrupted | … म्हणून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अखंड  

… म्हणून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अखंड  

Next

 

मुंबई : जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी उसळली, सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला अशा बातम्या अनेकदा कानावर आल्या. मात्र, किरकोळ बाजारात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र राज्यात कुठेही दिसले नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अन्नधान्य, भाजीपाला, फळे, गँस सिलिंडर, औषधे आदी अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याची साखळी अखंड ठेवण्याचे शिवधनुष्य राज्याच्या कामागार विभागाने समर्थपणे पेलले आहे. त्यासाठी १६ ते १७ हजार माथाडी कामगार दररोज घाम गाळत आहेत.

लाँकडाऊनच्या काळात राज्यातील १२ कोटी जनतेला जीवनावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी अभेद्य ठेवणे हे मोठे आव्हान होते. त्यासाठी माथाडी कामगारांची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचे कामगार विभागाने सुरवातीलाच हेरले होते. त्यामुळेच शासकीय धान्य, कृषी उत्पन्न बाजार समित्या, स्वयंपाकासाठी लागणा-या गँस सिलिंडरचे प्रकल्प, औषधे व इतर अत्यावश्यक वस्तुंची निर्मिती करणा-या कारखान्यांच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या माथाडी कामागारांच्या दैनंदिन कामकाजाचे सनियंत्रण कामगार आयुक्त कार्यालयाने आपल्या हाती घेतले होते. राज्यात  १ लाख १५ हजार ९५९ अत्यावश्यक सेवांची दुकाने आणि अस्थापना कार्यरत आहेत. तिथे अत्यावश्यक वस्तूंचा कोणताही तुडवडा निर्माण होऊ नये यासाठी कामगार विभाग कसोशीने प्रयत्न करत आहे.

------------------------------------------

रेल्वेच्या मदतीलाही धाव

अन्नधान्य , खते, साखर, सिमेंट आदी वस्तुंचा पुरवठा करणा-या रेल्वेच्या मालगाड्या राज्यात अनेक ठिकाणी अनलोडींगची सुविधा नसल्याने अडकून पडल्या होत्या. राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाला त्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कामगार विभाग त्यांच्या मदतीला धावून गेला, गेल्या दोन महिन्यांत ७५ मालगाड्यांमधिल वस्तुंचे अनलोडींग माथाडी कामगारांच्या मदतीने पूर्ण केल्याची माहिती सह आयुक्त रविराज इळवे यांनी दिली.

 

------------------------------------------

 

कामगार विभाग आणि माथाडींचा समन्वय

राज्यातील ९४६ धान्य गोदामांमध्ये आवश्यक धांन्याची चढाई – उतराई (चार हजार), २९५ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये भाजीपाला आणि फळांच्या उतराराई (पाच हजार), गँस सिलिंडर आणि अत्यावश्यक उत्पादनाची निर्मिती करणा-या सुमारे २५६५ कारखान्यांमध्ये (आठ हजार) जवळपास १६ ते १७ हजार माथाडी  कामगारांमुळे ही पुरवठा साखळी अखंड सुरू राहिली. अनेक छोटेमोठे अडथळे आले. मात्र, समन्वयाने मार्ग काढण्यात आला. यापुढेही जीवनाश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात खंड पडणार नाही याची खबरदारी घेतली जाईल.  

- रविराज इळवे, सहआयुक्त, कामगार विभाग   

 

Web Title: … So the supply of essentials is uninterrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.