पाण्याचं आता नो टेन्शन! तलावांमध्ये आता ९८ टक्के जलसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 07:01 PM2021-09-13T19:01:50+5:302021-09-13T19:04:33+5:30

Mumbai Water : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये आता ९७.७२ टक्के जलसाठा जमा झाला आहे. यामुळे पाण्याचे टेन्शन आता मिटले आहे. 

No tension of water in mumbai The lakes now have 98% water storage | पाण्याचं आता नो टेन्शन! तलावांमध्ये आता ९८ टक्के जलसाठा

पाण्याचं आता नो टेन्शन! तलावांमध्ये आता ९८ टक्के जलसाठा

Next

मुंबई - मागील महिन्यात पावसाने तलाव क्षेत्रात दडी मारल्याने पाणीकपातीचे संकट ओढावले होते. मात्र मागील काही दिवसांत मुंबईसह तलाव क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये आता ९७.७२ टक्के जलसाठा जमा झाला आहे. यामुळे पाण्याचे टेन्शन आता मिटले आहे. 

मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. तर वर्षभर मुंबईत सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर जलसाठा असणे अपेक्षित आहे. जुलै महिन्याच्या पंधरवड्यानंतर जोरदार बरसणाऱ्या पावसामुळे चार तलाव भरून वाहू लागले. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने जोर धरला नाही. त्यामुळे पाणीकपात लागू करण्याची शक्यता निर्माण झाली होती. 

पावसाचा शेवटचा महिना असल्याने सप्टेंबरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता कमी असते. परंतु, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तलाव क्षेत्रांतही मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे मोडक सागर, तानसा, विहार, तुळशी हे तलाव पुन्हा भरुन वाहू लागले आहेत. तर मध्य वैतरणा, भातसा, मध्य वैतरणा आणि अप्पर वैतरणा तलावही भरून वाहण्याच्या मार्गावर आहेत. 

१३ सप्टेंबर २०२१ रोजी जलसाठ्याची आकडेवारी (मीटर्समध्ये)

तलाव              कमाल     किमान      उपायुक्त साठा (दशलक्ष)     सध्या
मोडक सागर   १६३.१५   १४३. २६        १२८९२५                         १६३.१६
तानसा            १२८.६३    ११८.८७         १४४८२८                         १२८.६१
विहार             ८०.१२        ७३.९२          २७६९८                          ८०.३८
तुळशी           १३९.१७     १३१.०७          ८०४६                            १३९.३२
अप्पर वैतरणा ६०३.५१    ५९५.४४        २१२५८२                        ६०३.०५
भातसा            १४२.०७    १०४.९०         ७०६८८६                       १४१.७०
मध्य वैतरणा    २८५.००    २२०.००         १८५३८६                        २८३.५४


वर्ष        जलसाठा (दशलक्ष लिटर)   टक्के

२०२१             १४१४३५०                       ९७.७२
२०२०             १४१६४९३                      ९७.८७
२०१९             १४२२७०४                      ९८.३०

शासनाच्या अखत्यारितील भातसा आणि अप्पर वैतरणा ही मोठी तलाव आहेत. त्यामुळे ही तलाव अपवादानेच भरून वाहू लागतात. मात्र यंदा भातसा धरणाचे पाच गेट उघडले आहेत. तर अप्पर वैतरणा भरून वाहण्याच्या मार्गावर आहेत.
 

Web Title: No tension of water in mumbai The lakes now have 98% water storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.