'द कपिल शर्मा शो'(The Kapil Sharma Show)मध्ये जोरदार टाळ्यांसह 'चक दे फट्टे', 'गुरु' अशा शब्दांनी लोकांना गुदगुल्या करणारा नवज्योत सिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) पुन्हा एकदा कपिलसोबत दिसणार आहे. पण, यावेळी तो शोमध्ये जज म्हणून नाही तर पाहुणा म्हणून दिसणार आहे. २०१९ मध्ये त्याने अचानक शो सोडला होता. पण असे का? या मागचे कारण आजतागायत समोर आलेले नव्हते. पण आता जवळपास ५ वर्षे उलटल्यानंतर त्याने त्यामागचे कारण सांगितले आहे.
नेटफ्लिक्सवरील द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये नवज्योत सिंग सिद्धू झळकणार आहे. या शोमध्येच त्याने द कपिल शर्मा शो का सोडला, यामागचं कारणदेखील सांगितले. नवज्योत सिंग सिद्धूने राजकीय कारणामुळे हा शो सोडल्याचे सांगितले. मात्र या प्रकरणावर डिटेलमध्ये सांगण्यासाठी नकार दिला. द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये तो म्हणाला की, यामागे काही राजकीय कारण होते. काही खासगी कारणंदेखील होती.
नवज्योतचे कपिलवर आहे विशेष प्रेमनवज्योत सिंग सिद्धूने कपिल शर्मासोबत काम करतानाच्या आठवणी सांगितल्या आणि कॉमेडियनसोबतच्या त्याच्या दीर्घ सहवासावर चर्चा केली. सिद्धूने सांगितले की, तो सुरुवातीपासूनच कपिलच्या शोच्या अनेक सीझनशी जोडला गेला आहे, जेव्हा कपिलला 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज'वर पहिल्यांदा ओळख मिळाली. त्याच्या अनुभवांवर विचार करताना, त्याने 'द कपिल शर्मा शो'चे वर्णन 'देवाने पाठवलेला पुष्पगुच्छ' असे केले, जिथे प्रत्येक सदस्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. बिग बॉसमध्ये सामील झाल्यानंतर कपिलने शोमध्ये सहभागी होण्यासाठी त्याच्याशी संपर्क कसा साधला याची आठवण सांगितली.
शोमधून या कारणामुळे पडला बाहेरशोमधून बाहेर पडण्यामागचे कारण विचारले असता नवज्योत सिंग सिद्धू म्हणाला की, शोमधून बाहेर पडण्याच्या निर्णयात राजकीय कारणांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र त्याने याबद्दल फारसे काही सांगितले नाही. पुढे सांगितले की, 'राजकीय कारणे होती ज्याबद्दल मला बोलायचे नाही, इतरही कारणे होती आणि गुलदस्ता विखुरला गेला. तो पुष्पगुच्छ जसा होता तसाच पुन्हा एकत्र यावा अशी माझी इच्छा आहे. मदत करणारा मी पहिला असेन. त्याचा शो अजूनही चांगला परफॉर्म करत आहे. तो म्हणाला, ‘कपिल हुशार आहे.’