Join us

शो मस्ट गो ऑन! 'ठरलं तर मग' मालिकेतील अर्जुनची कामाप्रती निष्ठा, १०२ ताप असूनही करतोय शूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 11:10 IST

'ठरलं तर मग' मालिकेतील अर्जूनची कामाप्रती निष्ठा, अंगात १०२ ताप असूनही करतोय शूट, म्हणाला...

Amit Bhanushali: जवळपास २ वर्षांहून अधिक काळ ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सायली-अर्जुनच्या जोडीने तसंच सुभेदार कुंटुबाने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा ही मालिका मागे नाही. नवनवीन ट्विस्ट आणि  कथानकाने प्रेक्षकांना चांगलच खिळवून ठेवलं आहे. परंतु, या सगळ्या प्रोसेसमागे त्यातील कलाकार आणि संपूर्ण टीमची मोठी मेहनत असते. अशातच सोशल मीडियावर मालिकेतील अर्जुनने शेअर केलेल्या पोस्टने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

अनेकदा मालिकांच्या कामाच्या वेळाही फिक्स नसतात. सेटवर १२ ते १४ तास कलाकारांना काम करावं लागतं. त्याचा त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतात. असं असतानाही 'शो मस्ट गो ऑन' म्हणत कलाकार निष्ठेने काम करतात. याची प्रचिती नुकतीच ठरलं तर मग मधील अर्जुन साकारणाऱ्या अमित भानुशालीच्या एका कृतीतून आली आहे. नुकतीच सोशल मीडियावर अमितने शेअर केलेल्या पोस्टने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नुकताच अमित भानुशालीने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ठरलं तर मग मालिकेच्या सेटवरचा फोटो शेअर केला आहे. त्यासोबतच कॅप्शन देत अभिनेत्यान लिहिलंय की, अंगात १०२ ताप, तरीही हसत-खेलत काम करायचं, शो मस्ट गो ऑन..! असं म्हणत अभिनेत्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

दरम्यान, सध्या 'ठरलं तर मग' मालिका एका रंजक वळणार आहे. या मालिकेत साक्षी विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी सायली अर्जुनने कंबर कसली आहे. त्यात आता मालिकेत पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया