Join us

'आई कुठे काय करते' मालिकेविषयी मिलिंद गवळींनी सांगितली 'ही' खंत, म्हणाले- "आमचा एकत्र सीन नव्हता... "

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 12:44 IST

आई कुठे काय करते मालिका संपून आता ४-५ महिने झाले. मिलिंद गवळींनी या मालिकेविषयी त्यांच्या मनातील खंत बोलून दाखवली

मिलिंद गवळी आणि आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधतीची आई यांची सहा महिन्यानंतर भेट झाली. त्यावेळी मिलिंद गवळी म्हणाले, "जवळजवळ सहा महिन्यानंतर हा एक सुवर्णयोग जुळून आला, "आई कुठे काय करते" ही मालिका संपल्यानंतर मेधाताई जांबोटकर आणि माझं असं ठरत होतं की, आपण भेटूया, स्मिता जयकर आणि नमिता वर्तक यांना सुद्धा आमंत्रित करूया, मेधा ताईंचे आणि स्मिताजींचे खूप ऋणानुबंध आहेत, and they both are very fond of each other, आणि स्मिताजींना "आई कुठे काय करते" ही आमची मालिका खूप भावली होती."

"अनेक वर्ष न चुकता त्या आवडीने पाहायच्या, तसंच नमिता वर्तक "आई कुठे काय करते" लिहायची, त्यामुळे स्मिताजींना नमिताला आवर्जून भेटायचं होतं, आणि स्मिताजी आपली सिरीयल आवडीने बघतात याचं नमिताला सुद्धा खूप कौतुक होतं , पण या सगळ्या बायका अतिशय प्रतिभावान आणि खूप व्यस्त असल्यामुळे, त्यांचं एका वेळेला भेटणं शक्य होत नव्हतं, अनेक वर्षानंतर सिरीयल संपल्याच्या सहा महिन्यानंतर आज हा योग जुळून आला, शेवटी आज आम्ही सगळे मेधाताईं च्या पार्लेच्या घरी भेटलो, मी आणि दिपा, मेधाताई आणि श्री जांबोटकर, स्मिता जयकर, नमिता वर्तक आणि राकेश वर्तक, असे आम्ही मेधा ताईंच्या घरी भेटलो, उत्कृष्ट चविष्ट सारस्वत पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेतला, आणि मनसोक्त गप्पा मारल्या."

"माझ्या आणि मेधाताईंच्या मनातील अनेक वर्ष राहिलेली एक खंत पण नमिताला आम्ही सांगून टाकली,  आणि ती खंत म्हणजे "आई कुठे काय करते" मालिकेमध्ये अरुंधतीची आई म्हणजे मेधाताई आणि अनिरुद्ध देशमुख म्हणजे मी, आम्हा दोघांचा म्हणजे सासू आणि जावयाचा एकही सीन नमिताने लिहिला नव्हता, आम्हा दोघांना एक तरी सिन एकत्र करायचा होता, खरंच अनिरुद्ध देशमुख आणि अरुंधतीच्या आईचा सीन किती भारी झाला असता, तसं सासू ने आपल्या मुलीवर अनिरुद्ध ने केलेल्या अन्यायाबद्दल किती खंत किंवा राग किंवा दुःख व्यक्त केलं असतं, मालिका संपली आणि तो आमच्या दोघांच्या मनातला सीन राहूनच गेला."

"पण पडद्यावरचं नातं किती कडवट होतं आणि प्रत्यक्षातलं मेधाताईंचा आणि माझं, आमचं नातं किती गोड, respectful आणि मायेचा आहे हे कदाचित सिरीयलच्या प्रेक्षकांना कळणार नाही. आज स्मिताजींबरोबर त्यांच्या सिनेमांच्या आणि अध्यात्मावरच्या अशा सुरेख गप्पा पण झाल्या, श्रीकृष्णाची दोन मधुर गाणी सुद्धा ऐकली, "आई कुठे काय करते" मालिकेच्या माध्यमातून स्मिताजी आणि नमिताच नातं आधीच निर्माण झालो होतो, आज स्मिताजी आणि नमिता पहिल्यांदा प्रत्यक्षभेटल्या, त्यांच्यामध्ये एक वेगळा सुरेख संवाद पण झाला, माझा आणि दिपाचा वेळ कसा पुढे पुढे सरकत गेला आम्हा दोघांना कळलंच नाही आणि आम्ही दोघं Sweet Memories घेऊन घरी आलो..."

टॅग्स :मिलिंद गवळीआई कुठे काय करते मालिकाटेलिव्हिजन