PHOTO: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मधील जयदीप-गौरी पुन्हा आले एकत्र; काय आहे कारण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 16:40 IST
1 / 7'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. 2 / 7अलिकडेच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. तरीही मालिकेची क्रेझ काही कमी झालेली नाही.3 / 7यामध्ये गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव या कलाकारांनी मध्यवर्ती भूमिका साकारल्या होत्या. दरम्यान, मालिका संपल्यानंतर आता महिनाभरात जयदीप-गौरीने स्टार प्रवाहवर कमबॅक केलं आहे. 4 / 7'लग्नानंतर होईलच प्रेम' अन् 'ठरलं तर मग' च्या महासंगीत सोहळ्यात जयदीप-गौरी हजेरी लावणार आहेत.5 / 7शिवाय या संगीत सोहळ्यात त्यांचा दमदार परफॉर्मन्सही पाहायला मिळणार आहे.6 / 7याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. पुन्हा पडद्यावर लाडक्या जयदीप-गौरीला पाहून चाहते प्रचंड खुश झाले आहेत.7 / 7९ फेब्रुवारीला 'ठरलं तर मग' आणि 'लग्नानंतर होईल प्रेम' मालिकांचा तीन तासांचा महासंगीत सोहळा सायंकाळी ७ वाजल्यापासून स्टार प्रवाहवर पाहता येईल.