Join us

आता काय करते 'गाढवाचं लग्न' मधील राजकन्या सत्यवती? सौंदर्याची प्रेक्षकांना पडलेली भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 18:19 IST

1 / 8
'गाढवाचं लग्न' हा सिनेमा मराठी चित्रपटाच्या इतिहासातील एक ब्लॉकबस्टर सिनेमा आहे.
2 / 8
अभिनेते मकरंद अनासपुरे आणि राजश्री लांडगे यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट २००७ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
3 / 8
हा चित्रपट प्रदर्शित होऊन इतकी वर्ष उलटली तरी त्याची जादू काही कमी झालेली नाही. आज एवढ्या वर्षानंतरही प्रेक्षकांची या चित्रपटाला पसंती मिळते.
4 / 8
'गाढवाचं लग्न' मध्ये मकरंद अनासपुरे, राजश्री लांडगे यांच्याबरोबर अभिनेते संजय खापरे, समीरा गुजर, शरद पोंक्षे या कलाकारांनी देखील भूमिका साकारल्या होत्या.
5 / 8
दरम्यान, या चित्रपटात मिथिला नगरीची राजकन्या सत्यवतीची भूमिका अभिनेत्री समीरा जोशीने साकारली होती. तिच्या या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं.
6 / 8
आपल्या सहज सुंदर अभिनयाने आणि सौंदर्याने तिने प्रेक्षकांना भुरळ घातली.
7 / 8
त्यानंतर अभिनेत्री इंडस्ट्रीत फारशी सक्रिय दिसली नाही. दरम्यान, समीरा अलिकडेच 'आय एम सॉरी' या सिनेमात आणि 'रानबाजार' या वेबसीरिजमध्ये झळकली.
8 / 8
त्यानंतर ही अभिनेत्री 'प्रेमास रंग यावे' या मालिकेत झळकली. एकेकाळी उत्तम अभिनयासह सौंदर्यामुळे प्रेक्षकांना घायाळ करणारी लोकप्रिय अभिनेत्री आता युट्यूबर देखील सक्रिय असल्याची पाहायला मिळते.
टॅग्स :मराठी चित्रपटसेलिब्रिटी