Join us

ना 'बाहुबली', ना 'पुष्पा', ५० वर्षानंतरही 'या' चित्रपटाचा कोणीही मोडू शकला नाही रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 16:06 IST

1 / 7
एखाद्या चित्रपटाचं भवितव्य हे प्रेक्षकांच्या प्रतिसादावर अवलंबून असतं. सध्या इंडस्ट्रीत असे अनेक नवनवीन चित्रपट प्रदर्शित झालेत ज्यांनी करोडोंच्या घरात कमाई केली. नवे विक्रम रचले आहेत.
2 / 7
पण, क्वचितच असे असतात जे प्रेक्षकांच्या मनात कायमची खास जागा निर्माण करतात. काहींची जादू वर्षानुवर्षे उतरतच नाही, किंवा एखादा चित्रपट अनेकदा जरी पाहिला तरी त्याचा कंटाळा येत नाही. असाच एक चित्रपट म्हणजे 'शोले'. जवळपास ५० वर्षे उलटल्यानंतरही या चित्रपटाची चाहत्यांमध्ये अजूनही क्रेझ कायम आहे.
3 / 7
ऑल टाईम हिट असलेला 'शोले' हा चित्रपट १९७५ मध्ये रिलीज झाला होता. अमिताभ बच्चन, जया बच्चन, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी तसंच संजीव कुमार, अमजद खान हे दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत होते.
4 / 7
सुरुवातीला या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसा प्रतिसाद मिळाला नाही शिवाय अनेकजण चित्रपटावर टीका करत होते. त्यावेळी प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. पण चित्रपटातील अविस्मरणीय पात्रं आणि संवादांनी प्रेक्षकांना थिएटरमध्ये जाण्यास भाग पाडलं. या चित्रपटातील गब्बरचा 'कितने आदमी थे' हा डायलॉग प्रचंड लोकप्रिय झाला.
5 / 7
मीडिया रिपोर्टनुसार, 'शोले' चित्रपट सहा वर्षे थिएटरमध्ये चालला आणि या चित्रपटाची भारतात जवळपास १५ कोटी तिकिटे विकली गेली. इतकंच नाहीतर 'शोले' पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर भारतात त्याची ३ कोटी तिकिटे विकली गेली.
6 / 7
त्याचबरोबर वर्ल्डवाइड कलेक्शनबद्दल बोलायचं तर, शोले चित्रपटाला सर्वाधिक प्रेम रशियामध्ये मिळालं. जिथं चित्रपटाची सर्वाधिक ६ कोटी तिकिटे विकली गेली. याशिवाय, युरोप, उत्तर अमेरिका आणि मध्य पूर्व देशांमध्येही शोलेची क्रेझ असल्याची पाहायला मिळाली. एकूणच जगभरात चित्रपटाची २५ कोटी तिकिटे विकली गेली होती.
7 / 7
विशेष म्हणजे, 'बाहुबली २' आणि 'RRR' सारखे मेगा-ब्लॉकबस्टर चित्रपटही 'शोले'चा विक्रम मोडू शकलेले नाहीत.
टॅग्स :अमिताभ बच्चनधमेंद्रहेमा मालिनीअमजद खानबॉलिवूडसिनेमाबाहुबली