Join us

सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 13:31 IST

सलमान खानने सोहेलच्या लग्नाची खिल्ली उडवत कपिल शर्माच्या शोमध्ये "सोहेल आणि सीमाने पळून जाऊन लग्न केलं होतं. आणि नंतर ती स्वत:च पळून गेली", असं म्हटलं होतं. पण, सीमाने सोहेलला घटस्फोट का दिला, यामागचं कारण तिने सांगितलं होतं. 

बॉलिवूड अभिनेता सोहेल खान आणि त्याची एक्स पत्नी सीमा सजदेह २०२२ मध्ये घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले. खरं तर सोहेल आणि सीमा यांनी पळून जाऊन लग्न केलं होतं. त्यामुळेच २४ वर्षांच्या संसारानंतर त्यांनी घटस्फोट घेतल्याने चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. सलमान खानने सोहेलच्या लग्नाची खिल्ली उडवत कपिल शर्माच्या शोमध्ये "सोहेल आणि सीमाने पळून जाऊन लग्न केलं होतं. आणि नंतर ती स्वत:च पळून गेली", असं म्हटलं होतं. पण, सीमाने सोहेलला घटस्फोट का दिला, यामागचं कारण तिने सांगितलं होतं. 

सीमा सजदेहने 'फॅब्युलस लाइव्ह ऑफ बॉलिवूड वाइव्स' या शोमध्ये सोहेलसोबतच्या घटस्फोटाचं कारण सांगितलं होतं. "लग्नानंतर अफेअर असणं ही मोठी गोष्ट नाही. पण, जेव्हा नवरा-बायकोमध्ये भांडणं व्हायला लागतात आणि तुम्ही हसणं विसरुन जातं तेव्हा मग गडबड होते. नवरा-बायकोमधील भांडणाचा त्यांच्या मुलांवर परिणाम होतो. लग्नानंतर तुम्ही कोणत्या प्रकारचं अफेअर करता यावर हे अवलंबून आहे. पण, जर तुम्ही लग्नानंतर कुठल्या दुसऱ्या व्यक्तीचा विचार करत असाल तर तोदेखील एक प्रकारचा विश्वासघात आहे", असं सीमा सजदेह म्हणाली होती. 

सोहेल आणि सीमा यांनी १९९८ मध्ये पळून जाऊन लग्न केलं होतं. त्यांना योहान आणि निर्वान ही दोन मुले आहेत. लग्नानंतर २४ वर्षांनी सोहेल आणि सीमा यांचा संसार मोडला. सोहेलशी घटस्फोटानंतर सीमा विक्रम सिंगला डेट करत आहे. विशेष म्हणजे सोहेलशी लग्न करण्यापूर्वी तिचा विक्रमसोबत साखरपुडा झाला होता. 

टॅग्स :सोहेल खानघटस्फोट