Join us

"आईच्या अंत्यसंस्कारासाठी जायचं होतं पण पाकिस्तानने व्हिसा नाकारला.."; गायकाचा राग अनावर, काय घडलं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:08 IST

भारतात स्थायिक झाल्यावर पाकिस्तानने कसा बदला घेतला आणि किती वाईट वागणूक दिली याविषयी प्रसिद्ध गायकाने खुलासा केलाय. याशिवाय त्याने पाकिस्तानवर ताशेरे ओढले आहेत

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अदनान सामी (adnan sami) हा मूळचे पाकिस्तानचा. परंतु काही वर्षांपूर्वी अदनाने पाकिस्तान देश सोडला आणि कायमचा भारतात आले. भारताने पाकिस्तानवर हल्ला करुन ऑपरेशन सिंदूर राबवलं त्यावेळी अदनान सामीने भारताला सपोर्ट करून पाकिस्तानवर ताशेरे ओढले. नुकत्याच एका मुलाखतीत अदनानने त्याच्या आयुष्यातील अत्यंत वेदनादायक प्रसंग उघड केला आहे. आईचे अंत्यसंस्कार घेण्यासाठी अदनान सामीला पाकिस्तानमध्ये जायचं होतं. त्यावेळी पाकिस्तानने त्यांना कशी वागणुक दिली, याचा खुलासा त्यांनी केलाय.

आईचं अंतिम दर्शन घ्यायला जायचं होतं, पण....

नुकतंच आप की अदालतमध्ये अदनान सामीने हा दुःखद प्रसंग शेअर केला. अदनान सामीने २०१६ मध्ये भारतीय नागरिकत्व स्वीकारले होते, ज्यामुळे पाकिस्तानात वरिष्ठ पदावर असलेल्या अधिकाऱ्यांकडून आणि नागरिकांकडून अदनानला अनेकदा टीका सहन करावी लागली.

ऑक्टोबर २०२४ मध्ये अदनानची आई बेगम नूरीन यांचे निधन झालं. आईच्या अंत्यसंस्काराठी भारत सरकारने अदनानला त्वरीत प्रवास करण्याची परवानगी दिली. परंतु  पाकिस्तानने अदनानचा व्हिसाचा अर्ज फेटाळला. याशिवाय गायकाला व्हिसा देण्यास नकार दिला. त्यामुळे अदनानला आईचे अंतिम दर्शन व्हिडिओ कॉलद्वारे घ्यावे लागले.

"मी आईचा संपूर्ण जनाजा व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉलवर पाहिला", अशी भावुक आठवण अदनानने सांगितलं. यामुळे ज्या देशातून अदनान येतो त्या पाकिस्तानसोबत असलेल्या तणावपूर्ण संबंधांची त्याला चांगलीच जाणीव झाली. त्यांनी पाकिस्तान सरकारच्या धोरणावर टीका केली. सध्या अदनान भारतात असून ते भारतातील विविध शहरांमध्ये म्युझिक कॉन्सर्ट करत चाहत्यांचं मनोरंजन करत असतात.

टॅग्स :अदनान सामीपाकिस्तानभारतभारतबॉलिवूडसंगीत