Join us

"एखादी मुलगी आई-वडिलांच्या भीतीमुळे लग्नासाठी नकार..", कंगना राणौत राजा रघुवंशी हत्या प्रकरणावर काय म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 11:15 IST

सध्या देशभरात राजा रघुवंशी हत्या प्रकरण चांगलंच गाजत आहे. या प्रकरणाविषयी अभिनेत्री कंगना राणौतने लांबलचक पोस्ट लिहिली आहे. काय म्हणाली कंगना?

सध्या देशभरात एक प्रकरणाने चांगलंच चर्चेत आहे. हे प्रकरण म्हणजे राजा रघुवंशी मर्डर केस. राजा रघुवंशी हत्याकांडाबद्दल दररोज नवीन माहिती समोर येत आहे. पोलिसांनी सोनमला अटक केली. मेघालयात हनीमूनला गेलेल्या सोनमने गुंडांच्या मार्फत राजाची हत्या केली. अशातच राजाची पत्नी सोनमने तिच्या बॉयफ्रेंडच्या साहाय्याने राजाचा खून केला, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संपूर्ण घटनाप्रकरणी अभिनेत्री कंगना राणौतने तिचा राग व्यक्त केलाय. 

कंगना राणौतने व्यक्त केला राग

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. या स्टोरीमध्ये कंगना लिहिते, "हे किती विचित्र आहे. एखादी स्त्री आई-वडिलांच्या भीतीमुळे लग्न करायला मनाई करु शकत नाही. परंतु तीच स्त्री एका सुपारी किलरच्या माध्यमातून निघृण हत्या करु शकते. सकाळपासून मी या गोष्टीचा विचार करतेय पण काहीच समजत नाहीये. माझं डोकं दुखतंय. तिने घटस्फोटही घेतला नाही किंवा तिच्या प्रियकरासोबत पळूनही गेली नाही.हे किती क्रूर, विचित्र आणि मूर्खपणाचं लक्षण आहे."

"अशा मूर्ख लोकांना कधीही हलक्यात घेऊ नये. अशी माणसं कोणत्याही समाजासाठी धोकादायक आहेत. आपण अनेकदा अशा मूर्ख लोकांवर हसतो आणि ते आपल्याला काही नुकसान करणार नाहीत, असा विचार करतो. परंतु हे खरं नाही. हुशार माणसं आपल्या फायद्यासाठी दुसऱ्याला नुकसान पोहोचवू शकतात. परंतु मूर्ख व्यक्तींना ते काय करत आहेत, हेच कळत नाही. तुमच्या आसपास अशाच मूर्ख व्यक्ती असल्यास सावध राहा." अशाप्रकारे कंगना राणौत राजा रघुवंशी हत्या प्रकरणाने व्यथित झाली असून तिने राग व्यक्त केलाय. 

 

टॅग्स :कंगना राणौतबॉलिवूडशिलांग