Join us

"आमिर-अक्षयही ८ तास काम करतात", दीपिका-वांगा यांच्यातील वादावर कबीर खानचं भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 14:20 IST

फिल्ममेकिंग नक्कीच पॅशन आहे पण वर्क-लाईफ बॅलन्स करणं आवश्यक आहे.

अभिनेत्री दीपिका पादुकोणने (Deepika Padukone) गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मुलीला जन्म दिला. आता ती पुन्हा काम करण्यासाठी सज्ज आहे. दरम्यान दीपिकाची 'स्पिरीट' सिनेमात वर्णी लागली होती. या सिनेमात काम करण्यासाठी दीपिकाने दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्यासमोर काही अटी ठेवल्या. त्यातच ८ तासांच्या शिफ्टची अट होती. तसंच २० कोटी मानधन, प्रॉफिट शेअर याही मागण्या होत्या. वांगा यांनी या मागण्या अमान्य करत दीपिकाला सिनेमातून बाहेर काढलं. यानंतर आई झालेल्या अभिनेत्रींच्या शिफ्ट मागणीवर बरीच चर्चा झाली. दरम्यान प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खानने (Kabir Khan)आता यावर भाष्य केलं आहे.

मूवीफाइड बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत कबीर खान दीपिकाला पाठिंबा देत म्हणाला, "ही तर योग्य मागणी आहे. इतकंच काय आमिर खान आणि अक्षय कुमारही ८ तासांची शिफ्ट करतात. फिल्ममेकिंग नक्कीच पॅशन आहे पण म्हणून याचा तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होऊ नये यासाठी वर्क-लाईफ बॅलन्स करणं आवश्यक आहे. प्रत्येकाने ते पाळलं पाहिजे. मी स्वत: जास्तीत जास्त १२ तास काम करतोय, ना ओव्हरटाईम आणि ना सातव्या दिवशी शूट. सेटबाहेर सर्वांच्या वैयक्तिक आयुष्याचा आदर करण्याची ही गोष्ट आहे."

काही दिवसांपूर्वी अजय देवगणनेही या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली होती. तो म्हणालेला की, "मला नाही वाटत फिल्ममेकर्सला काही अडचण असावी. उलट अनेक लोक ही गोष्ट आता समजून घेत आहेच. प्रामाणिक फिल्ममेकर ही मागणी नक्कीच स्वीकारत असतील."

टॅग्स :कबीर खानदीपिका पादुकोणबॉलिवूड