Kalki koechlin: कल्की कोचलिन ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 'देव डी','डायन','ये जवानी है दिवानी' आणि 'भय' यांसारख्या चित्रपटांसाठी ती ओळखली जाते.विशेषत ये जवानी है दिवानी या चित्रपटातील तिची आदिती ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आजवर अनेक कलाकृतींच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची दखल घ्यायला भाग पाडलं आहे.
अशातच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये कल्की कोचलिननं तिच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल भाष्य केलं आहे. ऑल अबाऊट हर पॉडकास्टमध्ये त्या कटू आठवणींबद्दल सांगताना कल्कीने म्हटलं, एका वेदनादायी ब्रेकअपनंतर तिला अनेक महिने निद्रानाशाचा त्रास सहन करावा लागला होता. तेव्हा ती म्हणाली,"त्या घटनेनंतर मी कित्येक महिने निद्रानाश सारख्या समस्येने त्रस्त होते. या सगळ्या गोष्टींचा तुमच्या किती मानसिक परिणाम होऊ शकतो, हे माझ्या लक्षात आलं.या काळात मला झोप लागत नव्हती आणि रात्री २-३ वाजता जाग येत असे. त्यानंतर पुन्हा झोप येत नसल्याने मी गिटार वाजवत बसायचे किंवा स्वतःला इतर कामांमध्ये गुंतवून ठेवत असे.कारण, त्यामुळे मला पुन्हा झोप लागणं अवघड व्हायचं."
मात्र, या समस्येचा कामावरही परिणाम झाला का यावर बोलताना कल्किने सांगितलं," जेव्हा मला कामावर जायचं असायचं त्यावेळेस मलाच कळायचं नाही.आपण स्वप्नात आहोत की प्रत्यक्षात कामाच्या ठिकाणी आहोता,असा गोंधळ निर्माण व्हायचा. हा त्रास जवळपास चार महिने सुरू होता." असा धक्कादायक खुलासही तिने केला.
यावेळी कल्कीने कोणाचंही नाव घेणं टाळलं. मात्र, तिचे नाव दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत जोडले गेले होते.देव डी या चित्रपटात तिने सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केलं होतं.याच चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. दरम्यान तिची अनुराग कश्यपशी ओळख झाली.त्यानंतर २०११ मध्ये त्यांनी विवाह केला. पण, हे नातं फार काळ टिकलं नाही. अखेर २०१३ मध्ये ते वेगळे झाले आणि त्यांचा घटस्फोट झाला.
Web Summary : Kalki Koechlin opened up about battling insomnia for months after a painful breakup. She struggled with sleep, impacting her work and causing disorientation. The actress avoided naming names, though she was previously linked to Anurag Kashyap.
Web Summary : कल्कि कोचलिन ने एक दर्दनाक ब्रेकअप के बाद महीनों तक अनिद्रा से जूझने के बारे में बताया। उसे नींद में परेशानी होती थी, जिससे उसके काम पर असर पड़ता था और भटकाव होता था। अभिनेत्री ने किसी का नाम नहीं लिया, हालांकि पहले उनका नाम अनुराग कश्यप से जोड़ा गया था।