Stock Market : मध्यपूर्वेतील युद्धविरामाच्या घोषणेमुळे आज(९ एप्रिल) रोजी भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. दिवसअखेर BSE Sensex २,९४६.३२ अंकांनी (३.९५%) वाढून ७७,५६२.९० वर बंद झाला, तर Nifty 50 ८३७.७० अंकांच्या (३.७८%) उसळीसह २३,९९७.३५ वर बंद झाला. निफ्टी २४,००० च्या पातळीच्या अगदी जवळ पोहोचल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बाजाराची एकूण स्थिती
आजच्या व्यवहारात ३,६९८ शेअर्समध्ये वाढ झाली, तर ५०५ शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. यादरम्यान, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही मोठी तेजी पाहायला मिळाली. दोन्ही निर्देशांकांमध्ये सुमारे ४% वाढ नोंदवली गेली.
सर्वाधिक वाढलेले आणि घसरण झालेले शेअर्स
Shriram Finance
Adani Enterprises
Tata Motors
InterGlobe Aviation
Eicher Motors
तर घसरण झालेल्या शेअर्समध्ये
Coal India
Tech Mahindra
Nestle India
Wipro
ONGC
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
