Jitendra Sold His Andheri Property: ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र सध्या चित्रपटांपासून दूर असले तरी, ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. आता जितेंद्र एका जमिनीच्या सौद्यामुळे चर्चेत आले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याने अलीकडेच त्यांची अंधेरीतील मालमत्ता विकली आहे. जमिनीचा व्यवहार मे २०२५ मध्ये झाला होता. यातून जितेंद्र आणि त्यांच्या कुटुंबाला कोट्यवधी रुपयांचा फायदा झाला आहे.
तब्बल ८५५ कोटी रुपयांचा व्यवहार
सीएनबीसी टीव्ही १८ च्या वृत्तानुसार, जितेंद्र यांनी त्यांची अंधेरीतील मालमत्ता तब्बल ८५५ कोटी रुपयांना विकली आहे. हा सौदा जितेंद्र यांचा मुलगा आणि अभिनेता तुषार कपूरने केला आहे. या जमिनीच्या व्यवहारात ८.६९ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी आणि ३०,००० रुपयांची नोंदणी शुल्क आकारण्यात आला.
मालमत्ता कोणी खरेदी केली?
जितेंद्र आणि त्यांच्या कुटुंबाने ही मालमत्ता एनटीटी ग्लोबल डेटा सेंटर्स आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला विकली आहे. या कंपनीने ८५५ कोटी रुपये देऊन ही जमीन खरेदी केली आहे. ही कंपनी पूर्वी नेटमॅजिक आयटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखली जायची.
जितेंद्र यांची कारकीर्द अनेक सुपरहिट चित्रपट दिले होते.
जितेंद्र यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात १९६४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गीत गया पत्थरों ने' या चित्रपटाने झाली. या चित्रपटासाठी त्यांना फक्त १०० रुपये मानधन मिळाले होते. त्यांचा हा चित्रपट फ्लॉप ठरला. त्यानंतर १९६७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फर्ज' या चित्रपटाने या त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. वाढत्या वयामुळे त्यांनी गेल्या काही वर्षांपासून चित्रपटात काम करणे थांबवले आहे.