नवी दिल्ली : देशात करिअरच्या संधीची व्याख्या झपाट्याने बदलत आहे. भारतीय कर्मचारी आता केवळ उच्च पगाराकडे धावत नाहीत, तर त्यांना त्यांचे करिअर स्थिर, संतुलित आणि प्रगतीच्या मार्गावर न्यायचे आहे. सुमारे ८२ टक्के कर्मचारी चांगल्या पगाराइतकेच काम आणि जीवन संतुलनाला प्राधान्य देत आहेत, म्हणजेच आता करिअरच्या मार्गात त्यांना शांतता आणि प्रगती दोन्ही हवे आहे.
लोक काय शिकताहेत? : एआय आणि मशीन लर्निंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सायबर सुरक्षा
८५ % कर्मचारी म्हणताहेत स्किल वाढवणे गरजेचे.
८१ % जण पुढील वर्षात काहीना काही स्किल शिकण्याचा प्रयत्न करत आहेत.
२५ %महिला कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे मागे राहिल्या आहेत.