lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > काेराेनाने छाटले हवाई मालवाहतुकीचे पंख, मुंबई विमानतळावरून होणाऱ्या मालवाहतुकीत ३५ टक्के घट

काेराेनाने छाटले हवाई मालवाहतुकीचे पंख, मुंबई विमानतळावरून होणाऱ्या मालवाहतुकीत ३५ टक्के घट

प्रवासी संख्येपाठोपाठ मुंबई विमानतळावरून होणाऱ्या मालवाहतुकीतही तब्बल ३५.३० टक्के घट नोंदविण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 05:32 AM2021-03-30T05:32:26+5:302021-03-30T05:33:22+5:30

प्रवासी संख्येपाठोपाठ मुंबई विमानतळावरून होणाऱ्या मालवाहतुकीतही तब्बल ३५.३० टक्के घट नोंदविण्यात आली आहे.

Corona cuts wings of air cargo, cargo from Mumbai airport drops by 35% | काेराेनाने छाटले हवाई मालवाहतुकीचे पंख, मुंबई विमानतळावरून होणाऱ्या मालवाहतुकीत ३५ टक्के घट

काेराेनाने छाटले हवाई मालवाहतुकीचे पंख, मुंबई विमानतळावरून होणाऱ्या मालवाहतुकीत ३५ टक्के घट

मुंबई : प्रवासी संख्येपाठोपाठ मुंबईविमानतळावरून होणाऱ्या मालवाहतुकीतही तब्बल ३५.३० टक्के घट नोंदविण्यात आली आहे. एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत झालेल्या मालवाहतुकीचा अहवाल नुकताच भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केला. त्यातून ही माहिती समोर आली आहे. (Corona cuts wings of air cargo, cargo from Mumbai airport drops by 35%)

भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक बंद करण्यात आली. परंतु, या काळात विमानाद्वारे होणाऱ्या मालवाहतुकीवर कोणतेही निर्बंध लागू करण्यात आले नाहीत. तरीही मालवाहतुकीत घट नोंदवली. लॉकडाऊनमुळे उद्योग बंद ठेवण्यात आल्याचा हा परिणाम असल्याचे वाहतूक तज्ज्ञांनी सांगितले. 

रस्ते वाहतुकीवरही निर्बंध लागू केल्याने संपूर्ण वाहतूक साखळीवर त्याचा परिणाम झाला. नियमांमध्ये शिथिलता आणल्यानंतर या क्षेत्राची चाके फिरू लागली. परंतु, कोरोनापूर्व काळाच्या तुलनेत मालवाहतूक पूर्वपदावर आली नसल्याचे चित्र आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार, मुंबईवरून होणाऱ्या मालवाहतुकीत २० टक्के, तर देशांतर्गत ४९.५० टक्के घट झाली आहे.

Web Title: Corona cuts wings of air cargo, cargo from Mumbai airport drops by 35%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.