१२ जून हा भारतातील एविएशन क्षेत्रातील काळा दिवस ठरला. या दिवशी एअर इंडियाचं बोईंग ७८७ ड्रीमलायनर अहमदाबादमध्ये उड्डाणानंतर अवघ्या ३३ सेकंदात कोसळलं. विमानातील २४२ जणांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. याशिवाय, विमान निवासी भागात आणि रुग्णालयाच्या वसतिगृहात पडल्यानं सुमारे ३० जणांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये अनेक परदेशी नागरिकांचाही समावेश होता.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनसार, या दुःखद घटनेनंतर, एअर इंडिया आता ४७५ मिलियन डॉलर्सच्या (सुमारे ₹४,०८० कोटी) एविएशन क्लेमची तयारी करत आहे. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे (GIC) प्रमुख रामास्वामी नारायणन यांच्या मते भारताच्या इतिहासातील हा सर्वात मोठा एविएशन क्लेम असू शकतो." एअर इंडियानं अद्याप ब्लूमबर्गच्या प्रश्नांना उत्तर दिलेलं नाही.
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
क्लेमचं ब्रेकडाऊन
- विमानाची किंमत - दाव्याचा १२५ मिलियन डॉलर्स (१०७५ कोटी रुपये) हिस्सा विमानाचे अवशेष आणि इंजिनसाठी आहे.
- जीवितहानी - अन्य ३५० मिलियन डॉलर्स (३०१४ कोटी रुपये) प्रवासी आणि अन्य व्यक्तींच्या मृत्यू झाला त्यांच्या नुकसान भरपाईसाठी आहे.
विमानाचा दावा लवकर निकाली निघेल, परंतु नुकसान भरपाईच्या दाव्यांना वेळ लागू शकतो सं नारायणन म्हणाले.
प्रीमिअम वाढू शकतात?
ही रक्कम २०२३ मध्ये संपूर्ण भारतीय विमान वाहतूक उद्योगानं भरलेल्या प्रीमियमपेक्षा तिप्पट जास्त आहे. याचा परिणाम असा होईल की भारतीय विमान कंपन्यांचे विम्याचे हप्ते वाढू शकतात. जेव्हा विमान कंपन्या त्यांच्या विमा पॉलिसींचं नूतनीकरण करतात, तेव्हा या किंमती वाढू शकतात. परदेशी नागरिकांच्या बाबतीत, नुकसान भरपाई त्यांच्या देशाच्या कायद्यानुसार निश्चित केली जाईल, ज्यामुळे दाव्याची रक्कम वाढू शकते.
जागतिक कंपन्यांवर अधिक परिणाम
भारतीय विमा कंपन्यांवर फारसा बोजा पडणार नाही, कारण जीआयसीसारख्या कंपन्यांनी ९५ टक्क्यांहून अधिक जोखीम ग्लोबल रिइन्शुरर्सना विकली होती. त्यांचा एव्हिएशन इन्शुरन्स प्रीमियम एकूण प्रीमियमच्या फक्त १ टक्के आहे. ग्लोबलडेटाचे विश्लेषक स्वरूप कुमार साहू यांच्या मते, "खरा आर्थिक बोजा ग्लोबल रिइन्शुरर्सवर पडेल, ज्यामुळे संपूर्ण विमान विमा बाजारासाठी आणखी कठोर दर लागू होतील."