पुणे : नैऋत्य मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून, विदर्भ आणि मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रात जोरदार पाऊस सुरू आहे.
पुढील पाच दिवस पावसाची अशीच बॅटिंग सुरू राहण्याचा अंदाज असून त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होणार आहे. बिहार व उत्तर प्रदेशमधील आणखी काही भागात मान्सून दाखल झाला आहे.
मान्सून उर्वरित अरबी समुद्र, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशाचा उर्वरित भाग, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश व जम्मू-काश्मीरमध्ये आगेकूच करण्यास अनुकूल परिस्थिती आहे. उत्तर कोकण ते उत्तर केरळ किनारपट्टीवर द्रोणिका रेषा स्थिर आहे.
अधिक वाचा: आता सातबारा व इतर भूमी अभिलेख विभागाचे दाखले मिळणार थेट व्हॉटस ॲपवर
राज्यात कुठे, काय घडले?नाशिक : नद्या-नाल्यांना पूर, काही धरणांमधून विसर्ग, गोदावरीला पूर, दुतोंड्याच्या कमरेपर्यंत पाणी.अहिल्यानगर : घाटमाथ्यावर जोरदार पाऊस, मुळा धरणाकडे २१,५०० क्युसेकने पाण्याची आवक.सोलापूर : उजनी धरणात ६०% साठा; दौंडमधून २१ क्युसेकचा विसर्ग.
कधी, कोणता अलर्ट?पुढील पाच दिवस कोकण, गोवा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.२० जून : यलो अलर्ट : ठाणे, मुंबई, रत्नागिरी, रायगड, नाशिक, सातारा घाट परिसर.२० जून : ऑरेंज अलर्ट : पुणे घाट परिसर.२० ते २२ जून : यलो अलर्ट : रायगड, रत्नागिरी, पुढील काही दिवस कोकणात पावसाचा जोर कायम राहील.
अधिक वाचा: पीएम किसानचा २० वा हप्ता लवकरच खात्यावर जमा होणार; यादीत तुमचे नाव कसे चेक कराल?