Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > रब्बीसाठी 'या' दिवशी सुटणार गिरणाचे पहिले आवर्तन; वाचा कुठ पर्यंत येणार आहे पाणी

रब्बीसाठी 'या' दिवशी सुटणार गिरणाचे पहिले आवर्तन; वाचा कुठ पर्यंत येणार आहे पाणी

The first rotation of the mill will start on 'this' day for Rabi; Read how far the water will reach | रब्बीसाठी 'या' दिवशी सुटणार गिरणाचे पहिले आवर्तन; वाचा कुठ पर्यंत येणार आहे पाणी

रब्बीसाठी 'या' दिवशी सुटणार गिरणाचे पहिले आवर्तन; वाचा कुठ पर्यंत येणार आहे पाणी

खरीप हंगामाची कामे पूर्ण झाल्यानंतर रब्बी पेरण्यांकडे शेतकरी वर्ग सज्ज होण्याची चिन्हे आहेत. यावर्षी अंजनी व गिरणा धरण हे १०० टक्के पाण्याने भरल्याने रब्बीसाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

खरीप हंगामाची कामे पूर्ण झाल्यानंतर रब्बी पेरण्यांकडे शेतकरी वर्ग सज्ज होण्याची चिन्हे आहेत. यावर्षी अंजनी व गिरणा धरण हे १०० टक्के पाण्याने भरल्याने रब्बीसाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

गिरणा धरणाचे पहिले सिंचन आवर्तन १५ डिसेंबरला सुटणार आहे. या सिंचन आवर्तनाचे पाणी २२ डिसेंबरपर्यंत जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यात पोहोचण्याची शक्यता आहे, अशी माहिती गिरणा पाटबंधारे उपविभागाचे उपअभियंता कुलदीप पाटील यांनी दिली.

अंजनी धरणाच्या पाण्यासाठी अजून शेतकऱ्यांकडून मागणी अर्ज आलेले नाहीत. मागील पाणीपट्टी व पाणी मागणीचे अर्ज भरावेत, असे कळविण्यात आले आहे. दरम्यान, ऑक्टोबरअखेर अवकाळी पाऊस सुरू असल्यामुळे रब्बीच्या पेरण्या लांबणीवर पडलेल्या आहेत.

खरीप हंगामाची कामे पूर्ण झाल्यानंतर रब्बी पेरण्यांकडे शेतकरी वर्ग सज्ज होण्याची चिन्हे आहेत. यावर्षी अंजनी व गिरणा धरण हे १०० टक्के पाण्याने भरल्याने रब्बीसाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. एका बाजूला अंजनीचे आवर्तन, तर दुसऱ्या बाजूला गिरणेचे आवर्तन असा दुहेरी फायदा सिंचनासाठी होणार आहे.

एकंदरीत रब्बीसाठी गिरणा आणि अंजनी या नद्यांचे पाणी दोन्ही शेतांपर्यंत पोहोचणार आहे. ज्यामुळे खरीपातील झालेले पिकांचे नुकसान काहीअंशी का होईना मात्र रब्बीतील उत्पन्नातून भरून निघण्याची आशा शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे.  

हेही वाचा : प्राण्यांच्या संपर्कातून पसरणारा जीवघेणा आजार; जाणून घ्या ब्रुसेलोसिसची लक्षणं, कारणं आणि उपचार

Web Title : गिरना बांध से पानी छोड़ा जाएगा; एरंडोल तक जल्द पहुंचेगी सिंचाई

Web Summary : गिरना बांध का पहला सिंचाई चक्र 15 दिसंबर से शुरू, 22 दिसंबर तक एरंडोल पहुंचेगा। गिरना और अंजनी बांधों में जल स्तर बढ़ने से रबी सीजन की पैदावार की उम्मीदें बढ़ीं, खरीफ का नुकसान कम हुआ। किसानों से पानी के आवेदन जमा करने का अनुरोध किया गया है।

Web Title : Girna Dam Water Release Set; Irrigation to Reach Erandol Soon

Web Summary : Girna Dam's first irrigation cycle starts December 15th, reaching Erandol by December 22nd. Increased water levels in Girna and Anjani dams raise hopes for Rabi season yields, offsetting Kharif losses. Farmers are requested to submit water applications.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.