Maharashtra Monsoon Update : राज्यात मान्सूनने जोरदार एन्ट्री घेतली असून कोकण, मुंबई, आणि मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Monsoon Update)
हवामान विभागाच्या अंदाजानुसार (IMD) १६ ते १८ जून दरम्यान काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शेती आणि जनावरांबाबत आवश्यक काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. (Maharashtra Monsoon Update)
पावसाचा फटका पीक पेरणी, तणनियंत्रण आणि जमिनीच्या निचऱ्यावर होऊ शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी सजग राहणे आवश्यक आहे. (Maharashtra Monsoon Update)
राज्यात मान्सूनने आता आपला जोरदार सुरुवात केली असून, येत्या काही दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. (Maharashtra Monsoon Update)
कोकणात अतिवृष्टीचा इशारा
वायव्य राजस्थान ते उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत द्रोणिय स्थिती तयार झाल्यामुळे पावसाचा वेग वाढला आहे. या प्रणालीमुळे १६ जूनपर्यंत कोकणातील काही भागांमध्ये एक-दोन ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. हा पावसाचा जोर १८ जूनपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.
कोणत्या जिल्ह्याला कोणता इशारा?
मुंबई शहर व उपनगर : यलो अलर्ट (पावसाची शक्यता, सतर्क राहा)
ठाणे, पालघर, रायगड : ऑरेंज अलर्ट (मुसळधार पाऊस, दक्षता आवश्यक)
रत्नागिरी : रेड अलर्ट (अतिवृष्टीची शक्यता, अत्यंत सावधगिरी बाळगा)
मच्छिमारांसाठी सूचना
दक्षिण कोकण आणि गोव्यात सध्या ताशी ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने, मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. किनारपट्टी भागात समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे.
राज्यभर पावसाचा अंदाज
मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार, पुढील चार दिवसांमध्ये (१८ जूनपर्यंत) कोकणासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच १७ जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मान्सून सक्रिय
राज्यात काहीसा थांबलेला मान्सून १४ जूनपासून पुन्हा सक्रिय झाल्याचे निरीक्षण आहे. येत्या २० जूनपर्यंत कोकण, मुंबईसह राज्यात अनेक भागांत हलक्यापासून मध्यम ते मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार आहे.
सावधगिरी आणि सजगतेचा इशारा
हवामानातील या बदलांमुळे शेतकऱ्यांनी व नागरिकांनी विशेषतः समुद्रकिनारी आणि सखल भागात राहणाऱ्यांनी सतर्क राहावे. प्रशासनाकडून आवश्यक सूचना आणि अलर्टचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात पावसाचा जोर
शनिवारी सायंकाळी ठाणे, कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली.
यामुळे ठाणे शहरात काही ठिकाणी झाडे कोसळली, तर सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. कल्याणमधील काही भागही पाण्याखाली गेले.
मराठवाड्यातील काही भागात शनिवारी दुपारी तसेच मध्यरात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक भागात पाणी सचल्याचे पाहायला मिळाले.
शेतकऱ्यांना सल्ला
* बियाणे व खते योग्य प्रकारे कोरड्या व हवेशीर जागी साठवून ठेवा.
* शेतात पाणी साचू नये यासाठी निचऱ्याची सोय करून ठेवा.