Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाने अखेर दमदार हजेरी लावली असली, तरी येत्या २४ तासांत काही भागांमध्ये हवामानात बदल होणार आहे. विशेषतः रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग घाटमाथ्यावर जोरदार वादळी पावसाची (Heavy Rains) शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update)
राज्य आपत्कालीन केंद्र आणि हवामान विभागाने (IMD) ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, मराठवाड्यातही काही जिल्ह्यांत वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)
महाराष्ट्रभर पावसाचा जोर वाढत असून, घाटमाथ्यांवर पुढील २४ तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा (Heavy Rains) इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.(Maharashtra Weather Update)
कालच्या पावसाचा आढावा (१७ जून रोजी सकाळपर्यंत)
ठाणे – ७३.७ मिमी
रायगड – ५४.१ मिमी
रत्नागिरी – ४७.७ मिमी
पालघर – ४९.७ मिमी
पुणे – ११.९ मिमी
कोल्हापूर – १७.८ मिमी
सातारा – १९.७ मिमी
मुंबई उपनगर – ८३.४ मिमी
मुंबई शहर – ६२.९ मिमी
घाटमाथ्यांवर अलर्ट का?
पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी पर्यंत पोहोचण्याची शक्यता असून, मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची (Heavy Rains) शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी.
मराठवाडा हवामान अपडेट
प्रादेशिक हवामान केंद्रानुसार पुढील प्रमाणे मराठवाड्याच्या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविली आहे.
आज छत्रपती संभाजीनगर, जालना या भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
तर उद्या १९ व २० जून रोजी नांदेड, परभणी, हिंगोली, छ. संभाजीनगर, जालना या भागात पावसाचा अंदाज आहे.
या काळात काही भागांमध्ये ताशी ४०-५० किमी वेगाने वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात पेरणीसाठी योग्य परिस्थिती कुठे?
पेरणीयोग्य पाऊस (७५-१०० मिमी)
छत्रपती संभाजीनगर : पैठण, वैजापूर, कन्नड, सोयगाव
जालना : बदनापूर
बीड : वडवणी
लातूर : चाकूर
धाराशिव : तूळजापूर, उमरगा, लोहारा
नांदेड : बिलोली, कंधार, लोहा, देगलूर, किनवट
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* मराठवाडा भागांतील शेतकऱ्यांनी वापसा असल्यास पेरणी सुरू करू शकतात.
* इतर ठिकाणी पेरणीसाठी अजून वाट पाहाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.