Maharashtra Weather Update : कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा (Heavy rain) कहर सुरु आहे. येत्या चार दिवसांसाठी हवामान खात्याने सर्तकतेचा इशारा दिला आहे. तर काही जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कुठे वाहतूक विस्कळीत झाली आहे. (Maharashtra Weather Update)
राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून विशेषतः कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा (Heavy rain) जोर अधिकच वाढला आहे.
हवामान विभागाने (IMD) पुढील चार दिवसांसाठी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Weather Update)
कोकणात मुसळधार पावसाचा कहर
कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याठिकाणी पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून या भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, दापोली परिसरात रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतूक ठप्प झाली आहे.
२० जून सकाळपर्यंत रत्नागिरीत सर्वाधिक ४१.७ मिमी, ठाणे व पालघरात ४१.६ मिमी, रायगडमध्ये ४०.१ मिमी, मुंबई उपनगरात ३१.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गोदावरीसह अनेक नद्यांना पूर, जलसाठ्यात वाढ
पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला असून धरणांमध्ये जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुणे घाटातही ऑरेंज अलर्ट
पुणे घाटमाथ्याच्या परिसरात हवामान विभागाने शनिवारी मध्यरात्रीपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या काही तासांत जोरदार पावसाचा इशारा असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई उपनगरांत हलक्या सरी
मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज असून, दैनंदिन कामकाजावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही.
घाटमाथ्यावरही पावसाचा जोर
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नाशिक या घाटमाथ्यावरील जिल्ह्यांमध्ये २३ आणि २४ जून रोजी अति मुसळधार पावसाचा इशारा आहे. याठिकाणी यलो अलर्ट जारी केला असून नागरिकांनी काळजी घ्यावी.
मराठवाडा-विदर्भात पावसाचा उशिरा प्रवेश
२१ जून रोजी नांदेड, परभणी, हिंगोली भागात हलक्या सरींची शक्यता असून, २२ जूननंतर पावसाचा जोर कमी होण्याची चिन्हे हवामान विभागाने व्यक्त केली आहेत.
सावध राहा, सुरक्षित राहा
भारतीय हवामान विभाग (IMD)व महासागर माहिती सेवा केंद्राने लहान बोटींना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकरी, मच्छीमार व पर्यटनावर आधारित व्यवसाय करणाऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करावे.
महत्त्वाच्या सूचना
* घाटमाथ्याच्या आणि नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सतर्क रहावे
* अनावश्यक प्रवास टाळावा
* स्थानिक प्रशासनाचे निर्देश पाळावेत
* मोबाईलवर सतत हवामान अपडेट तपासत राहावे
शेतकऱ्यांना सल्ला
* पावसाच्या दिवसांत सुरक्षिततेचा विचार करूनच शेतात जाण्याचा निर्णय घ्यावा.
* पावसाच्या दिवसांमध्ये किटकनाशक फवारणी किंवा खत व्यवस्थापन टाळा.
* खते आणि बियाणे सुरक्षित ठिकाणी साठवावेत.