Join us
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Weather Update : मे महिन्यातच दुहेरी संकट! 'या' भागात पाऊस, तर इथे उष्णतेचा कहर IMD चा मोठा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 09:26 IST

Maharashtra Weather Update : मे महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात हवामानाने धक्कादायक वळण घेतले आहे. एका बाजूला तापमान ४४ अंशांपर्यंत पोहोचत असताना, दुसऱ्या बाजूला विदर्भातील चार जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.(Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : राज्यात मे महिन्याच्या सुरुवातीलाच हवामानाने पुन्हा एकदा अनिश्चित वळण घेतले असून राज्यभर उष्णतेचा कहर वाढत असतानाच विदर्भातील काही भागांत अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.(Maharashtra Weather Update) 

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (३ मे) विदर्भातील चार जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.(Maharashtra Weather Update) 

विदर्भात पावसाचा यलो अलर्ट

यवतमाळ, वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भागात तापमान ४२ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

उष्णतेचा पारा राज्यभर चढता

राज्यातील बहुतांश भागात उष्ण आणि कोरडे हवामान कायम राहणार आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात तापमानात मोठी वाढ होत असून अनेक ठिकाणी ४० अंशांच्या पुढे पारा जाण्याची शक्यता आहे.

कोकणात दमट उकाडा

मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारी भागांत उष्णतेसोबतच आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना अधिक उकाडा जाणवणार आहे. 

या भागात कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा चटका

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार असून दुपारच्या वेळेत गरम वारे वाहण्याची शक्यता आहे. 

तापमान ३८ ते ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते.

उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट

नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहणार आहे. बहुतांश भागात तापमान ४० अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मराठवाड्यात तापमान ४२ अंशांपर्यंत

छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये उन्हाचा तडाखा अधिक तीव्र होणार असून तापमान ३९ ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने नागरिकांना पुढील खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.

दुपारच्या वेळेत शक्यतो बाहेर जाणे टाळा

पुरेसे पाणी आणि द्रवपदार्थ सेवन करा

डोक्यावर टोपी, गॉगल किंवा कापड वापरा

लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी

शेतकऱ्यांनी वादळी वाऱ्याच्या शक्यतेमुळे पिके आणि जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी

पुढील काही दिवस सतर्कता गरजेची

राज्यातील हवामानातील हा दुहेरी बदल एका बाजूला प्रचंड उष्णता आणि दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचा धोका नागरिकांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस सतर्क राहणे आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे.

हे ही वाचा सविस्तर : Heatstroke Prevention Tips : उन्हाचा तडाखा वाढला; उष्माघात टाळण्यासाठी 'हे' करा सोपे उपाय

अधिक वाचा : Maharashtra Weather Update : उष्णतेचा अलार्म! नागपूरसह विदर्भात यलो अलर्ट, पुढे अवकाळीचा धोका?

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Weather Alert: Latest Forecast and Updates for the State

Web Summary : Maharashtra is experiencing changing weather patterns. Stay informed about the latest weather updates, including temperature fluctuations and potential rainfall, to plan your day effectively. Be prepared for possible weather changes.
टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजमहाराष्ट्रकोकणविदर्भमराठवाडा