Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांनी अचानक हजेरी लावत ग्रामीण भागात मोठं संकट निर्माण केलं आहे. (Maharashtra Weather Alert)
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.(Maharashtra Weather Alert)
या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने ७ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.(Maharashtra Weather Alert)
या ७ जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट'
हवामान विभागाने प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ७ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामध्ये खालील जिल्ह्यांचा समावेश आहे.
जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली या भागात ३० ते ७० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
इतर जिल्ह्यांची स्थिती (यलो अलर्ट)
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे तसेच विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर मुंबई, पुणे आणि ठाणे परिसरात ढगाळ वातावरण आणि उकाडा कायम राहील.
हवामान बदलामागील काय कारणं
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार,
* राजस्थान परिसरात निर्माण झालेलं सायक्लोनिक सर्क्युलेशन (Cyclonic Circulation)
* उत्तर भारतातील सक्रिय ट्रफ लाईन
* अरबी समुद्रातून खेचली जाणारी आर्द्रता आणि वेस्टर्न डिस्टर्बन्स
या सर्व घटकांमुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* शेतकरी बांधवांनी काढणी केलेले धान्य सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावे. जनावरांना सुरक्षित निवाऱ्यात बांधावे.
* विजा चमकत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात उभे राहू नका. शक्य असल्यास घराबाहेर पडणे टाळा.
अधिक वाचा : Electricity Bill Problems : वीजबिल अचानक वाढलं? स्मार्ट मीटर नव्हे; 'हे' आहे खरे कारण
