नीरा खोऱ्यातील धरण क्षेत्रात पावसाची संततधार चालू आहे. धरण क्षेत्रातील सर्व चारही धरणांत मोठा विसर्ग सुरू असून, मोठा पाणीसाठा जमा होत आहे.
खोऱ्यातील वीर, भाटघर, नीरा देवघर, गुंजवणी धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. वीर धरण ८७ टक्के भरले आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून २२ जूनपासून वीर धरणातून निरा नदीत दुपारी १२ वा. ६७३७ क्युसेक्सचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती निरा पाटबंधारे विभागाचे अभियंता शिवाजी जाधव यांनी दिली.
गतवर्षी २२ जून २०२४ रोजी या चार धरणांतील सरासरी एकूण पाणीसाठा ४:८८ टीएमसी व सरासरी टक्केवारी १०:५६ टक्के होती.
तर आज २२ जून रोजी याच चार धरणांतील सरासरी एकूण पाणीसाठा १७.३६ टीएमसी व सरासरी टक्केवारी ३५.९ टक्के एवढी आहे. वीर धरणातून नीरा उजवा व डावा कालव्यातून २२ जूनपासून पाणी सोडण्यात आले आहे.
२२ जून २०२५ रोजी दुपारी १२ वाजता वीर धरणातून ६,७३७ क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात येणार आहे. पावसाचे प्रमाण पाहता विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. - शिवाजी जाधव, कार्यकारी अभियंता, निरा उजवा कालवा विभाग, फलटण
अधिक वाचा: सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी 'या' पोर्टलवरून अर्ज घेण्यास सुरवात; कसा कराल अर्ज?