Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > राज्यात उष्णतेची लाट अन् मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज

राज्यात उष्णतेची लाट अन् मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज

Heat wave in the state and rain forecast in Madhya Maharashtra, Marathwada, Vidarbha | राज्यात उष्णतेची लाट अन् मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज

राज्यात उष्णतेची लाट अन् मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज

कमी दाबाची रेषा उत्तर तमिळनाडू ते कर्नाटक, मराठवाड्यावरून जात आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज आहे.

कमी दाबाची रेषा उत्तर तमिळनाडू ते कर्नाटक, मराठवाड्यावरून जात आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज आहे.

पुणे : कमी दाबाची रेषा उत्तर तमिळनाडू ते कर्नाटक, मराठवाड्यावरून जात आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज आहे.

विदर्भात उष्णतेची लाट येणार असल्याने हवामान विभागाने येथे यलो अलर्ट दिला आहे. पुण्यातही तापमान चाळिशीपार गेला आहे. कोरेगाव पार्क, वडगावशेरी, पुरंदर, इंदापूर येथे ४०
अंशांच्या वर पारा गेला.

राज्यातील कोकणात दमट व उष्ण हवामान राहणार आहे, तर धुळे, नंदूरबार, लातूर, वर्धा, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, जळगाव, नाशिक, नागपूर या जिल्ह्यांमध्ये एक दोन ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे.

विदर्भात ४८ तासांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याने यलो अलर्ट दिला आहे. पुणे व परिसरात हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज आहे. राज्यातील काही भागांमध्ये पावसाळी वातावरण तर काही भागांमध्ये उष्णतेची लाट, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.

विदर्भ चांगलाच तापत आहे, तिथले कमाल तापमान चाळीशी पार गेलेले आहे. कोरेगाव पार्क येथे ४०.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. तर वडगावशेरी ४०.४, पुरंदर ४०.१, इंदापूरला ४०.१ तापमानाची नोंद झाली. शिवाजीनगरला ३९.१ तापमान होते.

Web Title: Heat wave in the state and rain forecast in Madhya Maharashtra, Marathwada, Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.