मागील महिन्यात राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. अजून देखील काही भागात पाऊस पडतो आहे.
मात्र काही भागात काहीशी उघडीप दिली आहे. ह्या पावसादरम्यान धरणांचापाणीसाठा वाढलाय का? राज्यातील प्रमुख धरणांत किती पाणी आहे, हे जाणून घेऊया.
राज्यातील सर्व प्रमुख धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला पाणीसाठा असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा पुढीलप्रमाणे
धरणाचे नाव | सध्याचा पाणीसाठा (टीएमसी) | गेल्या वर्षीचा पाणीसाठा (टीएमसी) |
गोसीखुर्द | ४.६४ | ८.६७ |
तोतलाडोह | १८.७९ | १८.१४ |
ऊर्ध्व वर्धा | ८.८५ | ८.८७ |
जायकवाडी | २२.६० | २.९९ |
मांजरा | १.६३ | ०.०० |
ऊर्ध्व तापी हातनूर | ५.३२ | २.६३ |
गंगापूर | २.५० | २.४८ |
कोयना | १७.३६ | १०.०० |
खडकवासला | ०.८४ | १.०३ |
उजनी | १८.७२ | ०.०० |
भातसा | ९.९५ | ८.१७ |
धामणी | ३.११ | १.७७ |
अधिक वाचा: मोसमी पावसाला पोषक वातावरण; पुढील ३-४ दिवसात राज्यात या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता