हवामानातील उल्लेखनीय घडामोडींमुळे राज्यभरात अवकाळी पावसाचा तडाखा बसत असून काही भागांत गारपीट होत आहे.
हे बदल पुढील २४ तास कायम राहणार आहेत. मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये शुक्रवारीही अवकाळी पावसाची हजेरी लागेल.
तर, मुंबईतही पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामानातील बदलामुळे कमाल तापमानात घसरण झाली आहे.
या जिल्ह्यांत बरसणार
सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. मुंबईमध्येही पावसाची शक्यता आहे.
राज्यात ७ हजार हेक्टरला फटका
◼️ दोन दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीचा ११ जिल्ह्यांमधील ३० तालुक्यांना फटका बसला आहे.
◼️ यामध्ये सुमारे ७ हजार हेक्टरवरील गहू, हरभरा, कांदा, आंबा तसेच फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
अधिक वाचा: अवकाळी व गारपिटीमुळे ७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; 'या' जिल्ह्याला सर्वाधिक फटका
