Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > आडतदारांचा अचानक संप; लिलावाची वाट पाहत बसलेल्या शेतकऱ्यांना धान्य घेऊन घरी परतावे लागले

आडतदारांचा अचानक संप; लिलावाची वाट पाहत बसलेल्या शेतकऱ्यांना धान्य घेऊन घरी परतावे लागले

Sudden strike by auctioneers; farmers waiting for auction had to return home with grain | आडतदारांचा अचानक संप; लिलावाची वाट पाहत बसलेल्या शेतकऱ्यांना धान्य घेऊन घरी परतावे लागले

आडतदारांचा अचानक संप; लिलावाची वाट पाहत बसलेल्या शेतकऱ्यांना धान्य घेऊन घरी परतावे लागले

मका, बाजरी, गहू, ज्वारीसह विविध धान्याच्या लिलावाची वाट पाहत सकाळपासून ताटकळत बसलेल्या शेतकऱ्यांना धान्य मागे घेऊन घरी परतावे लागले.

मका, बाजरी, गहू, ज्वारीसह विविध धान्याच्या लिलावाची वाट पाहत सकाळपासून ताटकळत बसलेल्या शेतकऱ्यांना धान्य मागे घेऊन घरी परतावे लागले.

भिगवण : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिगवण उपबाजारात मूलभूत सुविधांच्या अभावामुळे आडतदार आणि व्यापाऱ्यांनी रविवारी (दि. २६) धान्य लिलाव पूर्णपणे बंद ठेवले.

या अचानक निर्णयामुळे आसपासच्या ४० किलोमीटर परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. मका, बाजरी, गहू, ज्वारीसह विविध धान्याच्या लिलावाची वाट पाहत सकाळपासून ताटकळत बसलेल्या शेतकऱ्यांना धान्य मागे घेऊन घरी परतावे लागले.

यामुळे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली असून, शेतकऱ्यांमध्ये राग आणि निराशेची लाट उसळली आहे. भिगवण उपबाजारात गेल्या अनेक महिन्यांपासून आडतदार आणि व्यापाऱ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याची तक्रार आहे.

पावसाळ्यात धान्य ओले पडून व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसते, शौचालयाचा पूर्णतः अभाव आहे. या मागण्यांसाठी वेळोवेळी बाजार समितीकडे तक्रारी नोंदविल्या असूनही कोणताही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.

या पार्श्वभूमीवर आडतदारांनी रविवारी लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. "आम्हाला सुविधा मिळाल्या नाही तर लिलाव चालवूच कसे? शेतकऱ्यांचा त्रास होत असला तरी आम्हीही जगायला शिकत नाही," असा सल्ला एका ज्येष्ठ आडतदाराने दिला.

या दिवशी सकाळी धान्य भरती घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना धक्का बसला. भिगवण उपबाजारात धान्य उतारले नाही, तर आडती बंद ठेवण्यात आल्या. परिणामी, लिलाव प्रक्रिया सुरू होईलच याची अपेक्षा करून आलेल्या शेतकऱ्यांना सकाळी १० वाजेपर्यंत वाट पाहावी लागली.

दुपारी १२ वाजता बाजार समितीने लिलाव रद्द असल्याचे जाहीर केले. यामुळे बारामती, इंदापूर, माण तालुक्यातील शेतकऱ्यांना वाहनभाडे, मजुरी आणि इंधन खर्चाचा अतिरिक्त बोजा उचलावा लागला. "आम्ही रात्रभर धान्य भरती घेऊन आलो, पण काहीच झाले नाही.

शेतकऱ्यांना मोठा फटका
◼️ व्यापारी आडतदारांनी घेतलेल्या या अचानक निर्णयामुळे आसपासच्या ४० किलोमीटर परिसरातील शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला.
◼️ मका, बाजरी, गहू, ज्वारीसह विविध धान्याच्या भरतीसह आलेल्या शेतकऱ्यांना धान्य मागे घेऊन घरी परतावे लागले.
◼️ वाहन चालकांना अतिरिक्त खर्च, मजुरांना मजुरी न मिळणे आणि शेतकऱ्यांना कर्जबाजारी होण्याची भीती निर्माण झाली आहे. "पुन्हा असा प्रकार घडू नये, म्हणून बाजार समितीने तातडीने सुधारणा कराव्यात," अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.

स्थानिक अर्थव्यवस्थेवरही झाला मोठा परिणाम
◼️ या घटनेचा परिणाम केवळ शेतकऱ्यांपुरताच मर्यादित राहिला नाही, तर स्थानिक अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला.
◼️ भिगवण उपबाजार हा पुणे जिल्ह्यातील प्रमुख धान्य व्यापार केंद्र आहे. येथे दररोज सरासरी ५० लाखांहून अधिक रुपयांची उलाढाल होते. रविवारचा लिलाव रद्द झाल्याने व्यापाऱ्यांनादेखील नुकसान झाले.
◼️ "आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो, पण सुविधा नसतील तर कसे चालेल? ही केवळ एक दिवसाची कारवाई आहे, पण मागण्या मान्य झाल्या नाही तर भविष्यात अशा घटना वारंवार घडू शकतात," असा इशारा आडतदार संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने दिला.

लवकरच सुविधा देणार
बाजार समिती सभापती तुषार जाधव यांनी सांगितले, आडतदारांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक निर्णय घेतला. याबाबत त्यांच्याशी बैठक घेतली, पण ठोस निर्णय घेता आला नाही. तरीही आम्ही लवकरच सुविधा उपलब्ध करून देणार आहोत.

अधिक वाचा: पुढील पाच दिवस राज्यातील 'या' भागात वीजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडणार

Web Title : आढ़तियों की अचानक हड़ताल; किसान अनाज लेकर घर लौटने को मजबूर।

Web Summary : भिगवन में आढ़तियों की अचानक हड़ताल से कृषि बाजार बाधित हो गया, जिससे किसान अपनी उपज के साथ फंसे रहे। बुनियादी सुविधाओं की कमी के कारण हड़ताल हुई, जिससे किसानों और व्यापारियों में वित्तीय नुकसान और निराशा हुई। बाजार समिति ने जल्द ही मुद्दों को संबोधित करने का वादा किया है।

Web Title : Brokers' strike halts auction; farmers return home with their grain.

Web Summary : A sudden strike by brokers in Bhigwan disrupted the agricultural market, leaving farmers stranded with their produce. Lack of basic facilities triggered the strike, causing significant financial losses and frustration among farmers and traders. The market committee has promised to address the issues soon.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.