करमाळा : आखातातील युद्धामुळेकेळीचे भाव कमालीचे पडले असून शेतकऱ्यांकडून व्यापारी केळी एक ते दीड रुपया किलोने खरेदी करत आहेत.
बाजारात मात्र विक्रेते डझनाला ४० ते ५० रुपये मोजत असल्याने चित्र दिसत असल्याने ग्राहकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.
अमेरिका व इस्त्रायलने इराणवर क्षेपणास्त्राने हल्ला चढविल्याने सध्या आखाती देशात युद्ध भडकले आहे.
याचा परिणाम करमाळा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांवर झालेला असून गेल्या तीन आठवड्यांपासून केळीचे भात कमालीचे पडलेले आहेत.
युद्धामुळे अस्थिर परिस्थिती निर्माण झाल्याने आखातात केळीची निर्यात बंद झाली आहे याचा फटका केळी उत्पादकांना बसलेला आहे.
एरवी १७ ते १८ रुपये किलो दराने निर्यात होणारी केळी आता रुपया ते दीड रुपया किलोने शेतकऱ्याकडून व्यापारी खरेदी करू लागला आहे.
शेतकऱ्याकडून कवडीमोल दराने खरेदी केलेली केळी व्यापाऱ्याकडून मात्र ग्राहकांना ४० ते ५० रुपये डझनाने विक्री होताना दिसत आहे.
आखाती देशात युद्ध सुरू असले तरी केळी देशातसुद्धा मोठ्या प्रमाणात विक्री होतात तरीपण युद्धाच्या नावाखाली व्यापारी केळी उत्पादकावर अन्याय करीत आहेत. शेतकऱ्याकडून कमी भावाने घेतलेली केळी बाजारात ग्राहकांना कमी भावात का विक्री करत नाही. - अण्णासाहेब सुपनवर अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
शेतकऱ्याकडून केळीची खरेदी केल्यानंतर केळी कोल्ड स्टोअरेजमध्ये पिकण्यासाठी ठेवावे लागतात. जवळपास आठ ते दहा दिवसांचा कालावधी यामध्ये जातो. त्याकरिता कोल्ड स्टोरेजचे भाडे, विजेचे बिल याकरिता खर्च येतो. त्यामुळे दर वाढवून केळी विकावी लागतात. - नाजिम बागवान केळी विक्रेता
अधिक वाचा: Maharashtra Rain Alert: हवामान बदलणार; राज्यात आजपासून पुन्हा गारपीट व वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
